5 April 2025 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | खाजगी कंपनी नोकरदारांनो, सॅलरी लिमिट वाढणार, EPF पेन्शन मध्ये वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Gold Mutual Fund | होय खरं आहे, या गोल्ड स्कीम 1 वर्षात 31 टक्के ते 33 टक्का परतावा देत आहेत, इथे पैशाने पैसा वाढवा ChatGPT Aadhaar Card | ChatGPT तुमचा फेक आधार-पॅन कार्ड बनवतोय, उत्साही Ghibli AI युझर्सचं बँक अकाउंट खाली होईल Horoscope Today | 05 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 05 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पडझडीतही तज्ज्ञांचा विश्वास कायम, पुढील टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटलं? - NSE: RPOWER Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर स्वस्तात खरेदी करून ठेवा, पुढे मोठा परतावा मिळेल, संधी सोडू नका - NSE: JIOFIN
x

कायदा सुव्यवस्थेवरून शिवसेनेची सामना'तून फडणवीसांवर बोचरी टीका

मुंबई : शिवसेना आमदारावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री फडणवीसांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सध्या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचे सुद्धा अधोरेखित केले आहे. राज्यातील पोलिसांना पक्ष कार्यकर्त्याचा दर्जा तर पक्षातील वाल्यांना कायदा-सुव्यवस्थेचे रखवालदार बनवले गेले आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून करण्यात आली आहे. मुंबईतील मेट्रोच्या कामाला विरोध करणाऱ्या शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर २ दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्याची गंभीर दखल शिवसेना पक्ष प्रमुखांनी घेतली आहे.

त्यामुळे ढासळत्या कायदा सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरण्यात येत आहे. तसेच ढासळलेल्या परिस्थितीवर शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृहखात्यावर अकार्यक्षम म्हणून ठपका ठेवला आहे. शहरात पोलिसांचा दरारा व कायद्याचा धाक असल्यामुळेच मुंबई आतापर्यंत सुरक्षित राहिली होती. परंतु मागील २-४ वर्षांत मुंबईची अधिक वाट लागली आहे. सर्वच बाजूने मुंबईवर जे अधिकारी लादले गेले ते फक्त ओरबडण्यासाठी व शहराची वाट लावण्यासाठीच आहेत असा वार सामनातून करण्यात आला आहे.

पंतप्रधानांच्या जिवास धोका असल्याची गुप्त वार्ता आपल्या पोलिसांना लगेच समजते, इतकेच नाही तर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे ‘बॉम्ब’ ठेवल्याची माहिती सुद्धा झटपट मिळते, पण आमदारावर हल्ले होणार आहेत किंवा रस्त्यावर कुणाला गोळ्या घातल्या जाणार आहेत हे पोलिसांना कसे कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. मुंबई शहरात सध्या ‘मेट्रो’ची मोठ्याप्रमाणावर कामे काढली आहेत. दरम्यान, त्यासाठी सर्व ठेकेदार नागपुरातूनच मागवले आहेत असा अनेकांनी दावा केला आहे अशी खरमरीत टीका करण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या