8 September 2024 7:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

मोदीजी ‘माझ्याशी केवळ १५ मिनिटे ‘राफेल’वर खुली चर्चा करा’ : राहुल गांधी

छत्तीसगड : छत्तीसगडच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप तसेच मोदींवर तुफान टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, शनिवारी सरगुजा येथे आयोजित एका रॅलीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट मोदींनी राफेल करारावर केवळ १५ मिनिटे माझ्याशी खुली चर्चा करावी असं खुलं आव्हान दिलं. त्यांनी केवळ १५ मिनिटं माझ्याबरोबर राफेलच्या विषयावर बोलू द्यावं आणि त्यानंतर तेवढ्याच वेळ स्वतः सुद्धा त्याविषयी बोलावं असं राहुल गांधी म्हणाले. राफेल लढाऊ विमानांच्या कराराद्वारे मोदींनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला तब्बल ३०,००० कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

काल राहुल गांधी यांची छत्तीसगड येथे शेवटची प्रचारसभा पार पडली. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नोटाबंदी, कर्ज बुडवणारे उद्योजक अशा विषयांवरून मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा करुन लोकांच्या अडचणी वाढवल्या. परंतु, श्रीमंत उद्योजकांना त्यांनी मोठा दिलासा दिला. मोदींनी श्रीमंत उद्योगपतींचे तब्बल ३. ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. परंतु, गरीब शेतकऱ्यांचे कोणतेही कर्ज त्यांनी माफ केले नाही, असा घणाघात केला.

छत्तीसगडमध्ये जर काँग्रेसचं सरकार आलं तर केवळ १० दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे काँग्रेस अध्यक्षांनी जाहीर केले. तसेच कर्जमाफीसाठी पैसे कुठून आणणार, याचे उत्तर सुद्धा उपस्थितांना दिले. ‘पंतप्रधान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा लोकांकडून आम्ही पैसे वसूल करु आणि गरीब शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु, असे त्यांनी उपस्थित जनसमुदायाला सांगितले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x