19 April 2025 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

न्यायासाठी बळीराजाचा भाजप-शिवसेना सरकारविरोधात एल्गार; विधानसभेवर मोर्चा

ठाणे : आज सकाळी दहाच्या सुमारास ठाण्यातील आनंदनगरमधल्या चेकनाका इथून शेतकऱ्यांच्या भव्य मोर्च्याला सुरुवात झाली आहे. राज्यातील बळीराजा तसेच आदिवासी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी ठाणे शहर ते आझाद मैदान असे तब्बल ४५ किलोमीटरचे अंतर पार करून मुंबई विधानसभेवर धडक देणार आहेत. राज्यभरातील हजारो शेतकरी तीव्र दुष्काळ असताना दुष्काळाचे चटके सोसत एकत्र येत आहेत. आज सकाळपासूनच ह्या मोर्चाची सुरुवात “आनंद दिघे प्रवेशद्वार “येथील जुना चेकपोस्ट नाका येथून करण्यात आली. दरम्यान, यावेळी लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी या मोर्चाचे प्रतिनिधित्व केले आहे.

तसेच या सभेचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे-पाटील असतील असं वृत्त आहे. दरम्यान, या मोर्चाला पाणीवाले बाबा राजेंद्र सिंह, कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, सुभाष वारे, स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि काळू राम काका दोधडे हे प्रमुख सर्व नेतेमंडळी पाहुणे म्हणून उपस्थित असतील आणि मार्गदर्शन सुद्धा करतील.

विशेष म्हणजे राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खान्देश, सांगली, सातारा ते ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आहेत. दरम्यान, आज पहाटे चार वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत कसारा रेल्वे स्थानकावरून तब्बल ८,००० ते १०,००० मोर्चेकरी विविध लोकलने ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. तसेच या भव्य मोर्चात ५०,००० पेक्षा अधिक शेतकरी आणि आदिवासी मोर्चेकरी सहभागी होतील अशी माहिती प्रकाश बारेला यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या