22 April 2025 3:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

गडकरींकडून विजय मल्ल्याची पाठराखण, म्हणाले 'तो घोटाळेबाज कसा'?

मुंबई : विजय मल्ल्याचे लंडनमधून भारतात प्रत्यार्पण होण्याआधीच त्याला सज्जन असल्याचा दाखल देण्यास भाजपकडून सुरुवात. कारण खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून आणि देशातून पलायन कडून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मल्ल्याची पाठराखण केली आहे.

मुंबईतल्या एका कार्यक्रमात त्यांनी संबंधित विषयाला अनुसरून हे वक्तव्य केलं आहे. प्रत्येक धंद्यात जोखीम ही असतेच. मग ते बँकिंग क्षेत्र असो किंवा कोणताही व्यवसाय चढ-उतार हे निश्चित येणार. मात्र झालेल्या चुका जर प्रामाणिक असतील, तर त्या मोठ्या मनाने माफ करून संबंधित व्यक्तीला दुसरी संधी द्यायला हवी, असं गडकरी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.

राज्य सरकारच्या सिकॉम या कंपनीनं सुद्धा विजय मल्याला कर्ज दिलं होतं. त्यानं ते ४० वर्षांपर्यंत व्याजसकट पैसे भरले. परंतु, दुर्दैवाने एव्हिएशन व्यवसायात आलेल्या घसरणीनंतर विजय मल्याला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला होता. आणि त्यामुळेच त्याला कर्ज चुकवने शक्य झाले नाही. त्याने चाळीस वर्षे व्याजासकट पैसे परत केले, मात्र त्याला काही हफ्ते आर्थिक अडचणींमुळे फेडता न आल्यानं थेट घोटाळेबाज कसं ठरवता येईल, असा प्रश्न उपस्थित केला.

विजय माल्या असो किंवा नीरव मोदी जर या लोकांनी खरोखर घोटाळे केले असतील तर त्यांना नक्कीच तुरुंगात पाठवायलाच हवे. परंतु एखाद्या आर्थिक संकटात अडकलेल्या व्यक्तीला आपण थेट घोटाळेबाज घोषित करणं कितपत योग्य आहे. त्यामुळे अशा विचाराने भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती होणार नाही, असं सुद्धा नितीन गडकरींनी बोलताना स्पष्ट केलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या