29 April 2025 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन स्टॉक मालामाल करणार; टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: SUZLON Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

एकवेळ हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होत नाहीत: गडकरींचं विधान

सांगली: सध्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार अशी चर्चा रंगली असताना गडकरी मात्र रोज नवनवीन विधानं करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची बाजू मांडली आणि अडचणी मांडल्या होत्या. परंतु प्रसार माध्यमांनी टीका करताच पुन्हा घुमजाव केले होते. त्यात आता पुन्हा त्यांनी सांगली येथील कार्यक्रमात धक्कादायक वक्तव्य केले आहे.

दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सिंचनावर विचार व्यक्त करताना ‘एक वेळ हिजड्याला मुलं होतील, परंतु सिंचन योजना काय पूर्ण होणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. परंतु, भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली, असं गडकरी यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात धक्कादायक वक्तव्य केले आहे.

उपस्थित शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना सिंचनावर बोलत असताना गडकरींची जीभ पुन्हा घसरली असंच म्हणावं लागेल . टेंभू सिंचन योजनेविषयी बोलताना गडकरींनी म्हणाले, ‘टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, असं आम्हाला देखील वाटलं नव्हतं. खरंतर असं बोलू नये. तरी बोलतो. ‘एकवेळ हिजड्याचं लग्न झालं तर त्याला मुलं होतील. पण सिंचन योजना काही पूर्ण होणार नाही. परंतु, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात ही योजना पूर्ण झाली. अखेर शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते.

परंतु, याआधी महाराष्ट्रात सिंचन योजना झाल्याचं नाहीत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केवळ काही तरी उदाहरणं देण्यासाठी गडकरी मागील अनेक दिवसांपासून काही सुद्धा धक्कादायक विधानं करत आहेत. राज्यात आणि देशात सर्वकाही भाजप सरकार सत्तेत आल्यावरच झालं आहे, अशा अविर्भावात भाजपची नेते मंडळी वावरत आहेत असंच म्हणावं लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या