22 April 2025 12:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

लष्कराच्या जीवावर स्वतःचा प्रचार करणाऱ्या मोदींना भारताने पाकिस्तानविरुद्ध २ युद्ध जिंकल्याचा विसर?

IndianArmy, PulwamaDistrict, Jaishemohammad

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाक व्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, सदर कारवाईत भारतीय प्रसार माध्यमांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसताना स्वतःच निरनिराळी आकडेवारी जाहीर करण्याची स्पर्धा लावली होती.

काल भारतीय पायलट अभिनंदन भारतात सुखरूप परतले आणि देशात सर्वांनाच आनंद झाला. मात्र, घटनेच्या दुसऱ्या दिवसपासून सर्व विरोधी पक्ष शांत असताना देखील मोदींसकट संपूर्ण भाजप भारतीय जवानांच्या नावाने राजकरण करताना स्पष्ट दिसत आहे. एकप्रकारे लष्कराचा आधार घेऊन मोदींनी देशात स्वतःचाच उदो उदो सुरु केला आहे. भारतीय लष्कर आणि हवाईदलाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसताना मोदी त्याच्याच नावाने लोकसभेची तयारी करत असल्याचे जाणवते.

धक्कादायक म्हणजे कर्नाटक भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येदुइरप्पा यांनी एअर स्ट्राईकमुळे कर्नाटकात भाजपच्या २२ जागा येतील असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजप भारतीय जवानांच्या बलिदानावर स्वतःच्या जागा वाढवत असल्याचं ध्यानात येत. सर्जिकल स्ट्राईकचा मोदी इतकं मार्केटिंग करत आहेत की त्यांना भारताने यापूर्वी १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानबरोबर थेट युद्ध पुकारून त्यांना धूळ चारल्याचा विसरच पडला आहे. भारतीय जवान हे मी पंतप्रधान झाल्यावर धडाडीने काम करू लागल्याचा कांगावा ते करताना स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, याच शूर आणि धाडसी भारतीय सैन्याच्या बळावर याआधी देखील भारताने युद्ध जिंकली आहेत अशी आठवण करून देण्याची वेळ आली आहे. शहिदांच्या बलिदानावर स्वतःची मतपेटी घट्ट करणाऱ्या मोदी आणि भाजपवर दिवसेंदवस संशय गडद होताना दिसत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या