16 April 2025 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

टोलवाटोलवीनंतर मुंबई महापालिकेची कबुली, त्या पुलाची जबाबदारी आमची होती

BJP maharashtra, shivsena, mns, uddhav thackeray, devendra fadnavis, bmc, bridge accident, csmt, cst

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटने नंतर शिवसेना प्रणित मुंबई महानगर पालिका आणि रेल्वे मध्ये चांगलीच टोलवाटोलवी रंगली. सुरुवातीला तर दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखवत आपली जबाबदारी सपशेल झटकली.

स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी या दुर्घटनेसाठी रेल्वे जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. लोअर परळचा ब्रिज कोसळला त्यानंतर सगळ्या पुलाचं ऑडिट झालं होतं मात्र, या पुलाचं ऑडिट झालेलं नव्हतं. याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेची आहे. यासंबंधी आधीचे नगरसेवक गणेश सानप यांनी रेल्वे प्रशासनाशी याप्रकरणी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीही यावर अद्याप काहीही कर्यवाही करण्यात आलेली नाही असं सुजाता सानप यांनी सांगितलं होतं.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीदेखील पुलाची जबाबदारी रेल्वेची असल्याचं सांगितल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर रेल्वे प्रशासनाने हा पूल महापालिकेच्या अख्त्यारित येत असून आम्ही सहकार्य करत असल्याचं सांगितलं होतं. पण महापालिका अधिकाऱ्यांना रात्री उशिरा या पुलाची जबाबदारी महापालिकेची होती स्पष्ट केल्याने संभ्रम दूर झाला आहे.

२५ वर्ष सत्तेत असलेली शिवसेना सामान्य मुंबईकरांच्या जीवावर उठली आहे काय? असा सवाल सामान्य मुंबईकर करत आहेत. कोणतीही घटना घडली कि त्याची जबाबदारी झटकायची आणि गोंधळ निर्माण करायचा. जर मुंबई महानगर पालिकेच्या अधिकारात हा पूल येत होता तर याची योग्य ती देखभाल का नाही केली गेली? सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे शिवसेना – भाजप अशा घटनांवर तू तू मै मै करत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात आणि सत्तेत मात्र सोबत मलाई चाखतात असा काहीसा विरोधाचा सूर आज सामान्य मुंबईकरांनी लावलेला आढळला.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या