19 April 2025 7:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा: सनातन समर्थकाच्या उमेदवारामुळे धर्मनिरपेक्ष काँग्रेस अडचणीत

Congress, Konkan, Sanatan Sanstha

मुंबई : काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष आणि कट्टर हिंदुत्ववादविरोधी पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी- लोकसभा मतदारसंघातून सनातन समर्थक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गेल्यावर्षी नालासोपारा येथून वैभव राऊत या तरुणाला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती. तो सनातन संस्थेचा पदाधिकारी होता. त्याच्या घरातून २० देशी बॉम्ब आणि २ जिलेटीन स्टिक जप्त करण्यात आल्या होत्या. चौकशीनंतर आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. वैभवच्या घरापासून काही अंतरावरील त्याच्या दुकानात बॉम्ब बनवण्याचे सामान मिळाल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले होते. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक काही दिवसापासून त्याच्या मागावर होते. वैभव राऊत हा गोरक्षकही होता. हिंदु गोवंश रक्षा समितीत तो सक्रिय होता.

दरम्यान, वैभव राऊत याच्या अटकेनंतर त्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला होता. काँगेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी त्या मोर्चाचे नेतृत्व केले होते. वैभवला करण्यात आलेली अटक हे कारस्थान असून त्याला न्याय न मिळाल्यास यापेक्षाही मोठा मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या