19 April 2025 9:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Rahul Gandhi in Manipur | भाजपाची सत्ता असलेल्या मणिपूर प्रशासनाने राहुल गांधी यांचा ताफा रोखला, जनतेची समर्थनार्थ घोषणाबाजी

Rahul Gandhi in Manipur

Rahul Gandhi in Manipur | मणिपूरमध्ये ३ मेपासून जातीय संघर्ष सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. २९ आणि ३० जून रोजी ते मणिपूरमध्ये राहणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये फिरकले नसून, भाजपाची सत्ता असूनही मोदी सरकार हिसाचार थांबविण्यात नापास झाले आहेत. दरम्यान, हिंसाचार सुरू झाल्यानंतर राहुल गांधी यांची ही पहिलीच मणिपूर भेट आहे.

दरम्यान, भाजपाची सत्ता असलेल्या प्रशासनाकडून राहुल गांधी यांचा ताफा बिष्णुपूरजवळ रोखण्यात आला, त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरने जाण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी इम्फाळ आणि चुराचंदपूर मध्ये ते हिंसाचारात बळी गेलेल्या लोकांना भेटणार आहेत आणि मदत शिबिरांना ही भेट देतील. मणिपूरमधील हिंसाचार आणि संकटासाठी काँग्रेसने भाजपला जबाबदार धरले आहे.

राहुल गांधींचा ताफा का रोखण्यात आला हे स्पष्ट करताना बिष्णुपूरचे एसपी हेस्नाम बलराम सिंह म्हणाले की, “जमीनी परिस्थिती पाहून आम्ही त्यांना (राहुल गांधी) पुढे जाण्यापासून रोखले आणि त्यांना हेलिकॉप्टरने चुराचंदपूरला जाण्याचा सल्ला दिला. राहुल गांधी ज्या महामार्गावरून जात आहेत, त्या महामार्गावर ग्रेनेड हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन आम्ही त्यांना परवानगी दिलेली नाही असं सांगण्यात आले आहे.

मणिपूरमधील बिष्णुपूरजवळ राहुल गांधी यांच्या ताफ्याला पोलिसांनी रोखल्यानंतर काँग्रेसने गुरुवारी सरकारवर निशाणा साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीय हिंसाचारग्रस्तांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी हुकूमशाही मार्गाचा वापर केल्याचा आरोप केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, सरकारची ही कृती पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि सर्व घटनात्मक आणि लोकशाही मूल्यांचे उल्लंघन करते. मणिपूरमध्ये राहुल गांधी यांच्या ताफ्याला बिष्णुपूरजवळ पोलिसांनी अडवले आहे, असे खर्गे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हिंसाचारग्रस्त भेटण्यासाठी आणि संघर्षग्रस्त राज्याला दिलासा देण्यासाठी मदत छावण्यांना भेट देत आहेत.

पंतप्रधान मोदींनी मणिपूरबाबत मौन तोडण्याची तसदी घेतलेली नाही. त्यांनी हे राज्य स्वत:च्या नशिबावर सोडले आहे. आता त्यांची दुटप्पी सरकारे राहुल गांधींची पोहोच रोखण्यासाठी हुकूमशाही मार्गाचा अवलंब करत आहेत. हे पूर्णपणे अमान्य आहे. मणिपूरला संघर्षाची नाही तर शांततेची गरज आहे असं खर्गे म्हणाले.

News Title : Rahul Gandhi in Manipur for 2 days check details on 29 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi in Manipur(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या