22 April 2025 3:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट; ईव्हीएमविषयी चर्चा झाल्याची शक्यता

MNS, Maharashtra navnirman Sena, Raj Thackeray, MLA Jayant Patil, MLA Ajit Pawar, NCP, EVM, EVM Ballet Paper, EVM Hacking, EVM Hack, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. परंतु विरोधकांकडून भारतीय जनता पक्षाने हा विजय ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून मिळवला असल्याची टीका होत आहे. त्यामुळे विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याविषयी माहिती मिळू शकलेली नाही, पण येत्या ९ ऑगस्टला क्रांती दिनी ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष एल्गार करणार आहेत. त्या अनुषंगाने ही भेट झाल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही दिवसात जाहीर होईल. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात येणार नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु पुण्यात रविवारी शरद पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत बॅलेट पेपरवर निवडणूक नसेल तर बहिष्कार ही राज ठाकरेंची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलं. जयंत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात आणखी काय चर्चा झाली? ते समजू शकलेले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणा अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर जे आंदोलन होणार आहे त्याची तयारी आता राज ठाकरे यांनी सुरु केलेली दिसते आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही दिवसात जाहीर होईल. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात येणार नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी मनसेची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ४ ऑगस्टला म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन आल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि त्यावेळी राज ठाकरे नेमकं काय भाष्य करणार याकडे प्रसार माध्यमांचं लक्ष लागून राहील आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या