19 April 2025 10:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

हिजबुलची काश्मीर खोऱ्यात धमकी; तर मुंबई-गुजरातमध्ये हायअलर्ट

Article 370, Jammu and Kashmir, High Alert, Gujarat

मुंबई : मुंबईत हाय अलर्ट असताना, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दिल्ली येथील मुख्यालयाच्या दूरध्वनीवर ‘दहशतवादी हल्ला होणार, रोखता आला तर रोखून दाखवा’, अशा धमकीच्या कॉलने एकच खळबळ उडाली. या कॉलनंतर मुंबईत कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, तपासात हा कॉल करणारा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे समजताच मुंबई शाखेने त्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. शुभमकुमार पाल (२२) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तानात फोन करण्यासोबत हा तरुण सोशल मीडियावर आयएसआय (पाकिस्तानी गुप्तहेर संघटना), आयसीस, सीरिया आणि अन्य यंत्रणांबाबत माहिती मिळवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने विद्यार्थ्याची चौकशी सुरु आहे.

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्यावतीने एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील दुकानदारांना दुकाने उघडी न ठेवण्याची आणि टॅक्सी चालकांना टॅक्सी न चालवण्याची धमकी दिली आहे. याशिवाय, येथील स्थानिक नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याची धमकी दिली आहे. याचबरोबर, येथील शाळांना सुद्धा दहशतवाद्यांनी इशारा दिला आहे. कुठल्याही रस्त्यावर मुली शाळेत जाताना दिसता कामा नये, अन्यथा त्यांना धोक्याचा सामना करावा लागेल, असे दहशतवाद्यांनी म्हटले आहे.

दरम्यान भारताने ३७० कलम रद्द करून काश्मीरची स्वायत्तता काढताच पाकिस्तानच्या नांग्या ठेचताच पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. आर्थिक कंगालीमुळे पाकिस्तान भारताशी युद्ध करू शकत नाही. त्यामुळेच पंतप्रधान इम्रान खान यांनी फतवा काढला की, जगाने करो वा न करो यापुढे आपण काश्मिरींच्या पाठीशी उभे राहायचे. त्यासाठी दर शुक्रवारी १२ ते १२.३० हा अर्धा तास शाळा, कॉलेज, कार्यालयांतील नागरिकांनी सर्व कामे थांबवून जिथे असाल तिथे थांबायचे आहे. याला ‘काश्मिरी अवर’ असे म्हटले जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या