वास्तवाशी विसंगत व केवळ विरोधकांच्या खच्चीकरणासाठीचा भाजपचा अंतर्गत निवडणूक सर्व्हे: सविस्तर

मुंबई : लोकसभा निवडणुकीत विराट विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप-शिवसेना युतीचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय वर्तुळातील काही घडामोडींमुळे युती होणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र असं असलं तरीही विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत महायुती करून लढल्यास किती जागा मिळतील, याचा सर्व्हेदेखील भाजपने केला आहे.
विरोधकांतील नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचत विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेनं आपली दावेदारी आणखीनच मजबूत केली आहे. पण तरीही सध्यातरी हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याचा धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे. म्हणून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी महायुतीचा सूर आळवायला सुरुवात केली आहे. मात्र या आकड्यांच्या साहाय्याने विरोधकांचं मनोबल खच्ची करण्याचा पुरेपूर प्रयत्न युतीच्या नेत्यांकडून होईल, असं चित्र आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भारतीय जनता पक्षाकडून एक सर्वेक्षण (सर्व्हे) करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महायुती २२९ जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आठवड्याभरातच युतीच्या जगावाटपावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचं सत्र सुरु होणार आहे.
२०१४ साली स्वतंत्र लढलेले शिवसेना – भाजप हे पक्ष यंदाची विधानसभा निवडणूक युतीत लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार विधानसभेत युतीला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या संख्याबळानुसार महायुती आणि अपक्ष मिळून १८३ जागांचं बहुमत आहे. सर्व्हेच्या आकड्यांनुसार त्यात आणखी ४० ते ५० जागांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी फक्त ५० ते ६० जागांपर्यंत सीमित राहण्याची चिन्हं दिसत आहेत.
विशेष म्हणजे सर्व्हे करणारा पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या भाजपने महायुती होणार, ही बाब लक्षात घेऊन सर्व्हे केलेला आहे. याचाच अर्थ युतीत निवडणूक लढवण्याची भाजपची भूमिका स्पष्ट होत आहे. दरम्यान, शिवसेनेकडून युवा नेते आदित्य ठाकरे यांना राज्याच्या राजकारणात बळ दिलं जात आहे. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणूनही शिवसेनेकडून प्रोजेक्ट केलं जात आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हेदेखील मी पुन्हा येईल असं म्हणत मुख्यमंत्रिपदावर पुन्हा एकदा दावा सांगत आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून युतीतच संघर्ष होण्याची शक्यता आहे.
मात्र २०१४ पासून भाजपच्या असाच अंर्तगत सर्व्हेचा अभ्यास केल्यास ते केवळ विरोधकांना मानसिक दृष्ट्या कमजोर करण्यासाठीच असतात, ज्याचा वास्तवाशी काहीच संबंध नसतो. राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकात असेच अंतर्गत सव्हे करून ते ‘सरकारच्या दरबारी प्रसार माध्यमांमार्फत’ उचलून धरण्यास सांगितले गेले. मात्र वास्तविक मतमोजणीनंतर वेगळेच आकडे समोर आले. वास्तविक जे आकडे आले ते देखील याच अंतर्गत सर्व्हेमुळे, ज्यामध्ये मतदाराचा कल अंदाज बघून बदलतो आणि त्यामुळे ‘अँटिइन्कमबंसी’ असून देखील भाजपने चांगली आकडेवारी गाठली. विरोधकांना संभ्रमित करण्यासाठी असले प्रयोग मोठ्या प्रमाणावर भाजपकडून केले जातात आणि त्याचा महाराष्ट्रात तरी मोठा परिणाम होताना दिसत आहे. सर्व्हतील कल पाहून विरोधकांचे उमेदवार प्रचारात अधिक पैसा खर्च करण्यास देखील कचरतात आणि त्याचा परिणाम विरोधातील उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेवर होतो, हा देखील अशा अंतर्गत सर्व्हेमागील उद्देश असतो असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं.
अगदी भारतीय जनता पक्षाकडे ज्या विधानसभा मतदारसंघात उमेदवाराचं नाही तिकडचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार देखील भाजपमध्ये दाखल होत आहेत आणि हेच त्या राजकीय मानस शास्त्राचे अचूक परिणाम आहे. त्यामुळे लवकरच आता लवकरच भाजपचे ठराविक ‘दरबारी पत्रकार आणि प्रसार माध्यमं’ भाजपच्या याच अंतर्गत सर्व्हेला अनुरूप आकडेवारी स्वतःच्या सर्व्हेमध्ये दाखवून, त्यावर LIVE डिबेट घडवून आणतील आणि सत्ताधाऱ्यांसाठी पोषक वातावरण पुढील महिन्याभरात निर्माण करतील, जे मागील काही वर्षांपासून चिरंतर सुरु आहे आणि त्यामुळेच विरोधक तगडा असला तरी तो कमजोर होताना दिसत आहे.
सध्या देशभर बेरोजगारी, मंदावलेली अर्थव्यवस्था आणि रोजच्या रोज बंद होत चाललेल्या कंपन्या हे सर्व रुद्ररूप घेताना दिसत आहे. महागाई आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि महिलासंबंधित गुन्हे हे वाढतच असताना मतदार भारतीय जनता पक्षावर यामुळे प्रचंड खुश आहे असाच त्याचा अर्थ निघतो. बेरोजगारी, महागाई, बंद पडत चालली सरकारी आणि खाजगी आस्थापन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा गंभीर समस्ये पैकी एकाविषयावरून सरकारं बदलताना देशाने पाहिलं आहे. मात्र सध्या या सर्वच गंभीर विषयांनी देशात आणि राज्यात कळस गाठलेला असताना मतदार भाजपवर प्रचंड खुश असल्याने तो भाजपाला प्रचंड मतांनी निवडून देणार आहे असा अंदाज कदाचित भाजपाने अंतर्गत सर्व्हेत वर्तविला असावा. विशेष म्हणजे भाजपाने हा अंतर्गत सर्व्हे करताना मतदाराला बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, पीक विमा योजना, पिण्याच्या पाण्याची समस्या, महिलांसंबंधित गुन्हे असा कोणत्या विषयावर प्रश्न विचारले याचा कोणताही उल्लेख किंवा माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘पेड मार्केटिंग’ तोंड वर काढणार हे निश्चित आहे. विशेष म्हणजे २ दिवसांपूर्वी भाजपाची लढत वंचित आघाडीशी असेल आणि विरोधी पक्षनेता देखील वंचितचा असेल असं खात्रीने सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने वंचितला एकही जागा दाखवली नाही हे विशेष म्हणावे लागेल.
अगदी साधं उदाहरण द्यायचं झाल्यास राज्यातील कोणत्याही प्रसार माध्यमांच्या अधिकृत फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटवरील बातम्यांवरील प्रतिक्रियांवर फेरफटका मारल्यास ९० टक्के प्रतिक्रिया या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतात. मात्र भाजपचे अंतर्गत सर्व्हे येतात तेव्हा सर्वकाही ‘भाजप-भाजप’ वातावरण झालं आहे, असा भास निर्माण केला जातो आहे. दरम्यान लवकरच भाजपचे दिल्लीश्वर अनेक ठिकाणी नारळ फोडण्याच्या बहाण्याने राज्यात दाखल होतील आणि महाराष्ट्रात जम्मू काश्मीरच्या लोकांच्या समस्या आम्ही कशा सोडवल्या यावर भाषणं देतील आणि महाराष्ट्रातील समस्या भाजपने ५ वर्षात संपवल्या आहेत असाच तोरा मिळवतील. त्यामुळे मतदाराने सत्ताधाऱ्यांच्या या राजकीय मानस शास्त्रापासून स्वतःला वाचवणं लोकशाहीसाठी महत्वाचं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA