22 April 2025 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

ओंजळीने पाणी प्या; दात घासण्यासाठी ब्रश ऐवजी 'दातून' वापरा: भाजप खासदाराचा सल्ला

BJP, MP Meenakshi Lekhi, Quit Plastic, Drink Water, Cupped hands

नवी दिल्ली : एखाद्या सामाजिक विषयावर भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार आणि खासदार काय सल्ला देतील याचा नेम नाही. देशभरात सध्या प्लास्टिकचा वापर प्लास्टिक बंदीवरून मोठं राजकारण याआधीच पेटल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र भारतीय जनता पक्षाच्या महिला खासदार मीनाक्षी लेखी यांनी सामान्यांना अजब सल्ला दिला आहे.

प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी पाणी पिण्यासाठी यापुढे पेल्याचा वापर न करता, ओंजळीने पाणी प्या. तसेच दात घासण्यासाठी प्लास्टिकच्या ब्रशचा वापर टाळून ‘दातून’ वापरा, असे हास्यास्पद उपाय भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुचवले आहेत. गुरुवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

उपस्थितांना संबोधित करताना भाजप खासदार मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, “मुळात आपल्याला पेल्यात आणि बाटल्यांची गरजच काय? जेव्हा आपण शाळेत होतो, तेव्हा आपण आपल्या हाताने पाणी प्यायचो. मला वाटतं की ही सर्वात स्वच्छ पद्धत आहे. कारण या प्रक्रियेत तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुता आणि पेला धुण्यासाठी पुन्हा पाणी देखील वाया जात नाही.”

पूर्वी जेव्हा भाजीवाला यायचा तेव्हा सर्वसामान्य लोकं वेताच्या टोपलीचा वापर करताना दिसायचे. त्यावेळी कोणतंही प्लास्टिक उपलब्ध नव्हतं. त्यानंतर आपली दातून वापरण्याची सवय देखील पूर्णपणे सुटली. आता हे प्लास्टिकचे टूथब्रश कचाऱ्यात जातात आणि हा कचरा पुन्हा डम्पिंग ग्राऊंडमध्ये फेकला जातो. पर्यावरणपूरक बॅग आणि सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी जुन्या कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला देखील भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दिला. दरम्यान, २०२२ पर्यंत एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकचा वापर संपवण्याचं अभियान पंतप्रधान मोदी राबवत आहे. पंतप्रधान येत्या 2 ऑक्टोबरला म्हणजेच महात्मा गांधीजींच्य जयंतीच्या निमित्ताने काही वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा करु शकतात.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या