19 April 2025 8:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

आज शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरेंसोबत महत्वाची बैठक

Shivsena, Aaditya Thackeray, Uddhav Thackeray, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आज आमदारांची बैठक होणार आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेवून उद्धव ठाकरे हे त्यांन मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच भाजपसोबत सत्ता स्थापनेबाबत त्यांची मतंही जाणून घेणार असल्याची चर्चा आहे.

सदर बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांची मतदेखील जाणून घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. आज दुपारी १२ वाजता मातोश्रीवर ही बैठक पार पडणार असून या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या आमदारांचा कल जाणून घेणार आहेत. तसंच यानंतर शिवसेनेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

अबकी बार २२० पार’ हा निर्धार पूर्ण करू न शकल्याने भाजप बॅकफूटवर गेली आहे. सत्तास्थापनेसाठी मदत करताना शिवसेनेकडून भाजपवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. २०१४ मध्ये भाजपने दुय्यम वागणूक दिल्याची खंत अजूनही शिवसेनेच्या मनात आहे. ती कसर भरून काढण्यासाठी शिवसेनेने आता लोकसभेच्या वेळीच ठरलेल्या ५०-५० च्या फॉर्म्युल्याची आठवण भाजपला करून दिली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर भाष्य करणे अनेकदा टाळले होते. मात्र, निवडणुकीचे निकाल जाहीर होताच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत लोकसभेच्या वेळीच ठरलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याची भाजपला आठवण करून दिली. त्याच प्रमाणे यावेळी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता.

गरज भासल्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देखील त्यासाठी मुंबईत येऊ शकतात. मात्र, सत्तावाटपाचा तोडगा दिवाळीनंतरच निघेल. त्यामुळे फडणवीस सरकारचा शपथविधी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे सूत्रांनी सांगितले. १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान भाजप आमदारांची नेतानिवडीसाठी बैठक होईल आणि त्यात फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या