22 April 2025 10:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

राऊत जिंकले भाजप हरली! 'आम्ही १६२' नाही तर १६९ मतांनी महाविकास आघाडीचं बहुमत सिद्ध

Shivsena, NCP, Congress, Mahavikaaghadi

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यास सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळत आहेत. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारला १६९ आमदारांनी सभागृहात समर्थन दर्शवल्याने उद्धव ठाकरे सरकारने हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ही ही घोषणा केली. यावेळी ४ आमदारांनी तटस्थ भुमिका घेतली. तर भाजपाच्या सर्व आमदारांनी सभागृहाचा त्याग केल्याने शून्य आमदारांनी याला विरोध केला असे वळसे-पाटील यांनी जाहीर केली.

एक हंगामी अध्यक्ष हटवून दुसरे अध्यक्ष बदलल्याची घटना देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती. त्यामुळे सरकारला अध्यक्ष का बदलावा लागला. संविधानाची पायमल्ली होत आहे. हंगामी अध्यक्ष झाल्यानंतर आजवर विश्वासमताचा प्रस्ताव आला नाही. तुम्हाला कसली भीती होती. गुप्त मतदान पद्धतीने मतदान झालं तर आपला विश्वास दर्शक ठराव मंजूर होणार नाही. याची भीती तुम्हाला होती. त्यामुळेच सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये जोरदार हंगामा झाल्याचं पहायला मिळालं. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून दादागिरी नही चलेगी अशी घोषणाबाजी केली. तसंच यावेळी मंत्र्यांचा परिचय सुद्धा योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरही आक्षेप घेतला. देशाच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष कधीही निवडण्यात आले नाही. हंगामी अध्यक्ष बदलण्याची गरज काय पडली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केली. नियम, कामकाज धाब्यावर बसवून विधीमंडळाचं काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

महत्वाची सूचना: आता तुम्ही सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज’वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास.

https://www.maharashtranama.com/online-test/

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या