विखेंची नगरमध्ये ताकद नव्हती; सर्व १२ जागा जिंकू म्हणत ३ जिंकल्या: राम शिंदे

नाशिक: महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा विजय झाला होता. रोहित पवार यांना १३५८२४ तर भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांना ९२४७७ मते मिळाली. राेहित पावर यांचा तब्बल ४३,३४७ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे मंत्री राम शिंदे यांना ५ वर्ष तरी घरी बसावं लागणार हे निश्चित झालं. निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आलेले रोहित पवार यांनी पहिल्याचा दणक्यात भाजपच्या एका मंत्र्याला पराभूत करून घरी बसवला होतं. सध्या कर्जत-जामखेडमधील रोहित पवारांचा वाढता राजकीय आवाका पाहता राम शिंदेंना पुढच्या दुसराच मतदारसंघ शोधावा लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे राम शिंदे देखील संतापलेले दिसतात.
आमदार रोहित पवारांनी राज्याचे मंत्री राम शिंदे यांना आव्हान दिले होते. राम शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांच्यासाठी ही निवडणूक पहिल्यापासूनच आव्हानात्मक आणि चर्चेची ठरली. सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार देखील गेलं असून भाजपने विभागनिहाय बैठक सुरु केल्या आहेत आणि त्याचाच भाग म्हणून उत्तर महाराष्ट्राची देखील बैठक नाशिकमध्ये पार पडली आणि तिथे देखील राम शिंदेंचा राग दिसून आला.
‘अहमदनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या पराभवाला काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार आहेत. ते ज्या पक्षात जातात, तिथं खोड्या करतात. त्या पक्षासाठी हानिकारक वातावरण निर्माण करतात,’ असा थेट आरोप माजी मंत्री व कर्जत-जामखेडचे भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी केला आहे.
राम शिंदे म्हणाले, ‘नगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे ५ आमदार होते. विखे आणि पिचड आल्यानंतर ती संख्या सातवर गेली होती. त्यात आणखी वाढ होणं अपेक्षित होतं. पण निवडणुकीनंतर ती तीनपर्यंतच मर्यादित राहिली. नगर जिल्ह्यातील जागा १२-० नं जिंकू असं विखे म्हणत होते. त्यांची काही फार ताकद होती, असं नाही. पण जी काही होती, त्याचा काहीही फायदा झालेला नाही. उलट अनेकांचा सूर त्यांच्या विरोधात आहे. ते जिथं जातात, तिथं वातावरण बिघडवतात.’
दरम्यान, आजच नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार आशिष शेलार यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधत नागरिक सुधारणा कायदा आणि शिवसेनेच्या भूमिकेवरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. देशहितासाठी भारतीय जनता पक्ष तडजोड करायला तयार आहे. शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखववा. शिवसेनेनं काँग्रेसच्या भितीमुळे आपली भूमिका बदलू नये. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे देशाचं हित आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी देशहितासाठी हे विधेयक स्वीकारावं. सरकार वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेनेसोबत राजकीय तडजोडीसाठी तयार असल्याचं मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलं.
पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची आढावा बैठक घेण्यासाठी मी आज नाशिक दौऱ्यावर असून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 14, 2019
देशहित महत्त्वाचे. सरकारं येतील जातील त्यामुळे सत्तेसाठी शिवसेनेने तडजोड करु नये.. मुख्यमंत्र्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करावा..यामध्ये आघाडी सोबत असेल तरीही आम्ही कायद्याच्या बाजूनेच राहू..जर आघाडी सोबत राहीली नाही तर सेनेला राजकीय सहकार्य आणि तडजोड भाजप करेल! pic.twitter.com/HR7cC2E48y
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 14, 2019
Web Title: Radhakrishna Vikhe Patil is Responsible For loss of BJP in Ahmednagar Assembly election 2019 says Former Minister Ram Shinde
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON