19 April 2025 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

CAA विरोध: आम्ही पुन्हा गांधी हत्या होऊ देणार नाही: यशवंत सिन्हा

Sharad Pawar, Yashwant Sinha, Gandhi Yatra, Opposed CAA NRC

मुंबई: सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून ‘गांधी शांती यात्रे’ला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आशिष देशमुख, मंत्री नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु झालेल्या या यात्रेचा शेवट दिल्लीतील महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाट येथे होणार आहे.

केंद्र सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला असून सरकारने आणलेल्या नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या एकतेला तडे गेले आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे समाजातील मोठ्या वर्गात नाराजी पसरली असून आता समाजातील सर्व वर्गांमध्ये एकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भारतातील नागरिकांना योग्य मार्ग दाखवण्याची आवश्यकता असून तो मार्ग महात्मा गांधी यांच्या विचारातून मिळेल.

भारतीय राज्यघटना धोक्यात आली असून ती वाचवण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालण्याची आवश्यकता असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात गांधी शांतात यात्रेची सुरुवात झाली. त्यावेळी शरद पवार बोलत होते. या शांतता यात्रेसाठी शरद पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.

 

Web Title:  Gandhi Yatra Begins at Gateway of India in Mumbai NCP President Sharad Pawar Showed a Green Flag.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या