19 April 2025 7:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

कलम ३७०: काश्मीरचा विशेष दर्जा काढून मोदींनी घातक चूक केली - इम्रान खान

Jammu Kashmir, Pakistan PM Imran Khan, PM Narendra Modi

इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातक चूक केली आहे, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी केला. पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथील विधिमंडळात इम्रान खान बोलत होते. मोदी यांनी निवडणुकीमध्ये पाकिस्तानचा वापर बळीच्या बकऱ्यासारखा केला. त्यामुळे त्यांना जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करावा लागला, असा आरोपही इम्रान खान यांनी केला.

पाकिस्तानात बुधवारी काश्मीर समर्थन दिन पाळण्यात आला, त्या निमित्ताने त्यांनी हे विधान केले. काश्मिरी लोकांच्या लढय़ाला पाकिस्तानातील अनेक लोकांनी पाठिंबा दिला आहे. ५ फेब्रुवारी हा पाकिस्तानात काश्मीर समर्थन दिन म्हणून पाळला जातो. इम्रान खान यांनी सांगितले, ‘नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्टला काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करून जी कृती केली, त्यामुळे एक दिवस काश्मीर स्वतंत्र होणार असा मला विश्वास वाटतो. त्यांनी हे पाऊल उचलले नसते तर काश्मीर प्रश्न इतक्या तीव्रतेने जगसामोर आला नसता. आता आम्ही जगापुढे सगळी परिस्थिती मांडू.’

मोदींनी भारताला जेथे नेले आहे तेथून मागे जाणे शक्य नाही. हिंदू राष्ट्रवादाचे भूत बाटलीतून बाहेर आले असून, त्याला मागे घेता येणार नाही’ असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. तसेच ‘या घडामोडींच्या साखळीतून अखेर काश्मीर स्वतंत्र होणार आहे’ असा दावाही त्यांनी केला आहे. ‘मोदी यांनी 5 ऑगस्टला केलेल्या कृतीनंतर काश्मीर स्वतंत्र होईल हा माझा विश्वास आहे. हा निर्णय त्यांनी घेतला नसता, तर हा मुद्दा त्यांना जगासमोर अधोरेखित करता आला नसता. त्याबद्दल जगाला सांगणे हे आपली जबाबदारी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title:  Pakistan Prime Minister Imran Khan slams PM Narendra Modi says he committed fatal mistake revoking special status Jammu Kashmir.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#ImranKhan(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या