22 April 2025 3:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मलिकांचे मनसेला गांधीवादाचे डोस; भावाच्या हात-पाय तोडण्याच्या भाषेकडे दुर्लक्ष केलं होतं

Minister Nawab Malik, NCP, Raj Thackeray, MNS Maha Morcha

मुंबई: पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला काल पार पडला. राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही मोर्चात सहभागी झाल्याच पाहायला मिळालं. हिंदू जिमखाना येथून सुरू झालेला मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. त्यांनतर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे कान टोचण्याबरोबरच सीएए, एनआरसीविरोधात मोर्चे काढणाऱ्यांनाही सज्जड दम दिला.

आझाद मैदानात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर आपली भूमिका मांडली. यावेळी आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले आहे. पण जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ. असा आक्रमक इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. ज्या देशाने तुम्हाला सगळ दिल त्याला बरबाद करायला कशाला बसलाय असा सवाल देखील त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना विचारला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज ठाकरेंना फटकारून काढलं. ‘दगडाला दगडाने आणि तलवारीने उत्तर देऊ असं कुणी बोलत असेल तर हे कायद्याचं राज्य आहे. शांतीप्रिय लोकं या राज्यात राहतात. हिंसा करण्याची भाषा असेल तर आम्ही गांधीवादी असून हे राज्यात खपवून घेणार नाही’ अशा शब्दात मलिक यांनी राज ठाकरेंना सुनावलं. तसंच, ‘प्रत्येक पक्षाला स्वत: ची भूमिका स्वीकारण्याचा अधिकार आहे. आता काही पक्ष मोर्चे काढत आहे, पण त्यांच्यामागे कुणी तरी आहे. त्यांच्यामागे कुणीही असलं तरी या राज्याला काहीही फरक पडत नाही’, असं म्हणत मलिक यांनी भाजपचा उल्लेख न करत टीका केली.

तत्पूर्वी, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आपल्या प्रभागात वर्क ऑर्डरशिवाय काम सुरु असल्याचं लक्षात आल्यानंतर कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली होती. तसेच कामगारांना हात पाय तोडण्याचीही धमकी दिली होती. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.

कुर्ल्याजवळच्या चुनाभट्टी भागात रस्त्याचं काम सुरू होतं. तिथे ४ कामगारांना कप्तान मलिकांनी मारहाण केली होती. यापुढे इथे दिसलात तर हाय-पाय कापून ठेवीन, अशी धमकीही त्यांनी दिली होती. कप्तान मलिक यांनी रस्त्यावर सुरू असलेल्या कामावरून मारहाण केल्याने खळबळ उडाली होती. रस्त्यावर एका ढिकाणी खोदकाम केलं होते आणि त्याठिकाणी फायबर केबलचं कामही सुरू होतं, या ठीकाणी मलिक आले आणि त्यांनी कामगारांकडून वर्क ऑर्डरची मागणी केली होती. त्यावेळी भावाच्या हातपाय तोडण्याचा भाषेवर मूग गिळून शांत राहणारे मंत्री नवाब मलिक सध्या मनसेला गांधीवादाचे डोस पाजत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.

 

Web Title:  Minister Nawab Malik criticized Raj Thackeray over MNS Maha morcha.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या