22 April 2025 1:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT
x

दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता – राज ठाकरे

Covid 19, Corona Crisis, Raj Thackeray

मुंबई, ४ एप्रिल:  दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. दिवे लावायला सांगण्याऐवजी त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं असतं, आपण देश म्हणून कुठे चाललो आहोत, याचा माहिती दिली असती तर बरं झालं असतं, असंही त्यांनी नमूद केलं. राज ठाकरे यांनी आज (शनिवार) राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकंदरीत परिस्थितीवर भाष्य केलं.

“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

करोनामुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात पोलीस, नर्स आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर हात उगारलाच कसा जाऊ शकतो?, असा सवाल करतानाच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांसह कोणत्याही कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

देशातील निवणुकीच्या काळात कोणाला मतदान करायचं असं आवाहन करणारे मौलवी आहेत कुठे सध्या असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला. सध्याच्या वातावरणात विषय काय धर्माचा नाही असं सांगताना मरकझ जमातीच्या एकूण वागणुकीवर देखील संशय व्यक्त केला आहे.

तसेच आरोग्य खात्यावर कमीत कमी लक्ष दिलं गेल्यानं सध्या आणीबाणीची परिस्थिती उद्भवलीय. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या बाबतीत कठोर पावलं उचलावी लागतील अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे असं देखील ते म्हणाले. आणीबाणीच्या परिस्थितीत काळा बाजार करणाऱ्यांना फोडून टाकलं पाहिजे. त्यांना अशा परिस्थितीत या गोष्टी सुचतात कशा? अत्यावश्यक सेवांची व्यवस्था सरकारनं योग्य पद्धतीनं केली पाहिजे. यांचा एक वेगळा विभाग करा. त्यांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजेत तर लोकांना विश्वास वाटेल. पंतप्रधानांनी यावर बोलायला हवं होतं असं देखील ते म्हणाले.

 

News English Summary: MNS chief Raj Thackeray said that the Prime Minister should have shown a ray of hope rather than lighting the lamps. He said that instead of asking for lights, he would have guided the people, if they had informed us where we were going as a country, then it would have been better. Raj Thackeray today (Saturday) interacted with the people of the state. At that time, he spoke on the overall situation.

 

News English Title: Story MNS Chief Raj Thackeray speaks about Corona virus Covid 19 condition Maharashtra India social media News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या