19 April 2025 8:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

लॉकडाऊनची मदत झाली, पण तो दीर्घकाळ राहिल्यास अर्थव्यवस्थेला मोठा धोका

Lockdown, Anand Mahindra

नवी दिल्ली, १२ मे: देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६०४ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ७० हजार ७५६ झाली आहे. लॉकडाउन असतानाही दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. आतापर्यंत करोनानं २२९३ जणांचा बळी घेतला आहे. या सर्वांमध्ये दिलासादाक बाब म्हणजे देशात अजूनही समूह संसर्ग झालेला नाही. देशात आतापर्यंत २२ हजार ४५४ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४६ हजार ८ आहे.

दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी लॉकडाउनचं समर्थन केलं, मात्र त्यासोबत अर्थचक्र देखील महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, जपानमधील युद्धात पराभूत झालेल्या योद्ध्यांनी युद्धबंदी होण्यापासून वाचण्यासाठी स्वत:च्या पोटात चाकू खुपसून आत्महत्या करण्याच्या पर्याय निवडला होता, त्या प्रथेला हारकिरी असे म्हटले जाते. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असल्याचं वाटत असतानाच नवीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. आपली लोकसंख्या आणि उर्वरित जगातील कोरोना संक्रमणाची कमी प्रकरणं पाहिल्यास आपल्याकडे तपासण्या वाढल्या असल्या तरी संसर्ग होण्याच्या नवीन घटनांत वाढ होणे अपरिहार्य आहे. आम्ही आलेख तात्काळ खाली येईल, अशी आम्ही अपेक्षा करू शकत नाही.

पण याचा अर्थ लॉकडाऊनने काहीही मदत झाली नाही, असा नाही. महिंद्रा म्हणाले की, भारताने आपल्या कोरोना युद्धात कोट्यवधी संभाव्य मृत्यू टाळले आहेत. लॉकडाऊन दीर्घकाळ राहिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका आहे. वाढत्या धोक्यापासून अर्थव्यवस्थेला वाचवण्याची गरज असून, रुग्णालयातील ऑक्सिजन, पीपीई कीट सारखं सामान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं आहे. तसेच सामाजिक अंतराचं पालन करणंही आवश्यक आहे, असंसुद्धा आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.

दुसरीकडे, ब्रिटनमध्ये कोरोनाचा फटका बसलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याकरता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सर्व व्यवहार सुरू करण्याकरिता योजना जाहीर केली आहे. त्यामुळे तेथील लोकांना सामाजिक अंतराचा नियम पाळून आताच्या तुलनेत बराच काळ घराबाहेर राहण्याची संधी मिळणार आहे. जॉन्सन हे नुकतेच करोनाच्या संसर्गातून बरे झाले असून त्यांनी दूरचित्रवाणीवरील भाषणात सांगितले की, पाच पातळ्यांवरची सतर्कता यंत्रणा सरकार राबवणार असून त्यात करोना विषाणू पसरण्याच्या वेगावर वैज्ञानिक माहितीच्या आधारे लक्ष ठेवले जाणार आहे.

 

News English Summary: Mahindra said India has avoided billions of possible deaths in its Corona War. Prolonged lockdown poses a major threat to the country’s economy. There is a need to save the economy from the growing threat, and there is a need to make hospital supplies like oxygen and PPE kits available in large quantities.

News English Title: Covid 19 Increasing lockdown would be suicide economy Anand Mahindra News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या