19 April 2025 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

घरात घुसून मारेन सांगत सत्तेत, अन जवान शहिद होताच 'घरात कोणी घुसलेच नाही'

Kanhaiya Kumar, India China

नवी दिल्ली, २० जून : भारत-चीन संदर्भातील विषयही सध्या देशात चर्चेचा विषय ठरला आहे. गलवान खोऱ्यात उद्भवलेल्या संघर्षानंतर भारतात राजकीय वातावरणही तापू लागलं. अनेक विरोधकांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यातच, भारत आणि चीनदरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळे राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारला अनेक सवाल उपस्थित केले.

या गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चिनी सैन्य भारतीय हद्दीत घुसले होते. मात्र मोदींंनी हा दावा फेटाळून लावला. चीनचे सैन्य भारतीय भूभागावर आले नव्हते, असा दावा मोदींनी केलाय. मात्र, यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दोन सवाल केले होते. “चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती”, असं म्हणत राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले. “आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?”, असा जाब राहुल यांनी सरकारला विचारला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी अनेक सभांमध्ये शत्रू राष्ट्रांना उद्देशून ‘घर मे घुसकर मारुंगा’ अशी वक्तव्य केली होती. नेमका त्याचाच संदर्भ घेत कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका केली आहे. याबाबत ट्विट करताना कन्हैया कुमारने म्हटले आहे की, “मी घरात घुसून मारीन” असे सांगून सत्तेत आलेले आमचे २० जवान झाल्यानंतर म्हणतात की “घरात कोणतीही घुसखोरी केलेली नाही”…हे फेकूच नाही तर डरपोक सुद्धा आहेत..

News English Summary: After the martyrdom of our 20 soldiers who came to power by saying that I will enter the house and say No one enters the house says Kanhaiya Kumar News latest Updates.

News English Title: After the martyrdom of our 20 soldiers who came to power by saying that I will enter the house and say No one enters the house says Kanhaiya Kumar News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Kanhiya Kumar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या