22 April 2025 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

त्यावेळच्या राजकीय घडामोडीवर खरं पुस्तक मी लिहणार, सगळा घटनाक्रम डोक्यात - फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई, २३ जून : राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींनी वेग घेतला होता. ऐनवेळी सत्ता वाटपाचं सूत्र न जुळल्यानं शिवसेना भाजपापासून दूर गेली. त्यानंतरही भाजपानं राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता स्थापन केली. मात्र, हे सरकार अल्पजीवी ठरलं. या नाट्यात देवेंद्र फडणवीस यांना सर्वकाही जुळवून येऊनही मुख्यमंत्री होता येत नसल्याची घटना फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. खुद्द फडणवीस यांनीच पत्रकार राजू परुळेकर यांनी घेतलेल्या मुलाखती दुःख बोलून दाखवलं.

राज्यात राजकारणात गेल्या नोव्हेंबर महिन्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या, अनेक वर्षाचे मित्र शत्रू बनले तर शत्रूच्या गोटात सहभागी होऊन मित्राला धडा शिकवला. शिवसेना-भाजपा यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन संघर्ष झाला आणि हे दोन्ही पक्ष एकमेकांपासून दुरावले. याबाबत एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस म्हणतात की, प्रत्येक गोष्टीला खरी बाजू असते. मुख्यमंत्रिपदाचं शिवसेनेला वचन दिलं होतं, असं उद्धव ठाकरे सांगतात, पण मला कधीच वरिष्ठ नेतृत्वाने सांगितले नाही, ५० टक्के जागा वाटप हे ठरलं होतं, त्यानुसार पत्रकार परिषदेत घोषणा झाली, अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाबाबत कधीच शब्द दिला नव्हता असं त्यांनी मला सांगितले. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपाने कधीच शब्द दिला नाही, या सर्वच गोष्टीतून मार्ग निघाला असता पण उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं, फोन घेतले नाहीत, मागील ५ वर्षात एवढा संवाद असताना फोनवरुन बोलण्यासही नकार दिला त्याचं दु:ख वाटलं असं त्यांनी सांगितले.

तसेच आज अनेकजण पुस्तक लिहित आहे पण त्यावेळच्या राजकीय घडामोडीवर खरं पुस्तक मी लिहणार आहे, माझ्याकडे सगळा घटनाक्रम डोक्यात आहे, ज्यावेळी शिवसेना आमच्यासोबत येणार नाही असं लक्षात आलं त्यावेळी आमच्याकडे काय पर्याय आहे असा विचार केला त्यावेळी आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर आली, थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाहीत, त्या संदर्भात योग्य त्या चर्चाही झाल्या, एका बैठकीत मी होतो, एका बैठकीत नव्हतो, सगळ्या चर्चा मला माहिती आहेत, त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आपली भूमिका बदलली आम्ही कॉर्नर झलो.. दोन-तीन दिवस शांत बसलो, कुठलीच कृती केली नाही, पण दोन-तीन दिवसांनी अजितदादांकडून आम्हाला पर्याय आला, शरद पवार जे आधी म्हणाले, स्थिर सरकार भाजपा-राष्ट्रवादीच देऊ शकते, तीन पक्षाचं सरकार बनवणं मला मान्य नाही म्हणाले, मी सरकार बनवायला तयार आहे सांगत त्यांच्याकडे स्ट्रेंथही होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी द इनसाइडर या मुलाखतीदरम्यान केला.

 

News English Summary: Many people are writing a book today but I am going to write a real book on the political developments of that time, I have the whole chronology in my head, when I realized that Shiv Sena will not come with us, I thought what option do we have said Devendra Fadnavis.

News English Title: I will write a real book on the political developments of that time with all the events in my mind said Devendra Fadnavis News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या