22 April 2025 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

देशात व राज्यात परिस्थिती काय? इथे लोकांना काय करावं हे सुचत नाही अन चंद्रकांतदादांना सुचली कविता

Chandrakant Patil

मुंबई, २४ एप्रिल: देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते. मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी देशात विक्रमी 3 लाख 44 हजार 949 नवीन रुग्ण आढळले. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत एखाद्या देशात एका दिवसात नवीन रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी 2,620 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला.

दुसरीकडे अमेरिकेच्या प्रसिद्ध इन्स्टिट्यूटने चालू वर्षात भारतात करोना मृत्यूसंख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. १० मे रोजी भारतात ५ हजार ६०० जणांचा करोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, १२ एप्रिल ते १ ऑगस्ट या कालावधीत देशात ३ लाख २९ हजार जणांचा करोनामुळे मृत्यू होऊ शकतो. तसेच जुलै अखेरीपर्यंत एकूण ६ लाख ६५ हजार मृत्यू होऊ शकतात, असंही इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासात म्हटलं आहे.

एकाबाजूला राज्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या भीषण स्थितीमुळे रुग्णांना ऑक्सिजन, औषधं, बेड्स, व्हेंटीलेटर्स आणि लस मिळत नसताना दुसरीकडे भाजपच्या नेत्यांना आजच्या अनिल देशमुख यांच्या संबंधित घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय उकळ्या फुटल्याचं पाहायला मिळतंय. त्यात राज्यात परिस्थिती काय आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना तर थेट कविता सुचल्याचं पाहायला मिळाल.

अनिल देशमुख यांच्या संदर्भात बोलताना “आज तुम्हाला दोन ओळींची कविता वाचून दाखवतो असं म्हणत चंद्रकांत पाटील म्हणाले की, “इतनी उचाई ना देना प्रभू की धरती पराई लगने लगे, इतनी खुशिया भी न देना की दुख पर किसीके हसी आने लगे. नही चाहीये ऐसी शक्ती जिसका निर्बल पर प्रयोग करु नही चाहीये ऐसा भाव की किसीको देख कर जल जल मरु. ऐसी चतूराई भी न देना जो लोगोंको छलने लगे”. त्यामुळे आता अनिल परबांवरही सीबीईआय चौकशी झाली पाहिजे”.

 

News English Summary: Patients are not getting oxygen, medicines, beds, ventilators and vaccines due to the dire situation caused by corona in the state, while on the other hand, BJP leaders are witnessing a political upheaval due to the current political developments related to Anil Deshmukh. In it, we will see what the situation is like in the state and the BJP state president has directly suggested the poem.

News English Title: Chandrakant Patil read the poem after CBI raided on Anil Deshmukh house news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या