22 April 2025 3:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

देशाचे भलेही स्मशानभूमीत रुपांतर झालं तरी चालेल, पण आपल्या 'मालकाची' प्रतिमा मलिन होता कामा नये - स्वरा भास्कर

Bollywood actress Swara Bhaskar

नवी दिल्ली, २४ एप्रिल: देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते. मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी देशात विक्रमी 3 लाख 44 हजार 949 नवीन रुग्ण आढळले. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत एखाद्या देशात एका दिवसात नवीन रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी 2,620 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला.

सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्याने देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात करोनाची वाढती प्रकरणे आणि ऑक्सिजनची तीव्र कमतरतात लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बैठक घेतली. त्याच वेळी ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वागणुकीवर चिडले, कारण त्यांनी बैठकीत झालेल्या खासगी चर्चेचे थेट प्रक्षेपण केलं होतं.

दरम्यान, याच मुद्दयावर अंजना ओम कश्यपने ‘हल्ला बोल’ या डिबेट शोमध्ये राघव चढ्ढा यांना प्रश्न विचारला की लोकांचे प्राण वाचवणे हे महत्वाचे आहे की, अशा परिस्थितीतही आपली इमेज चमकवणे ? यावर उत्तर देताना राघव चढ्ढा म्हणाले, “प्रत्येक वेळी ते पंतप्रधानांच्या बैठकीत थेट लाईव्हच भाषण देतात, यावेळी गोपनीय, रहस्यमयी किंवा नॅशनल सिक्योरिटीबद्दल चर्चा होत नव्हती, तरी या गोष्टींमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले. ”

आजतकने थेट राघव चढ्ढा यांनी जाहीर माफी मागितल्याचे सांगत सगळ्या गोष्टी ट्विटच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले.हे ट्विट पाहून स्वरा भास्करचा मात्र चांगलाच पारा चढला आणि थेट रिट्वीट करत तिनेही निशाणा साधला. वाहवा आजतक राघव चढ्ढा यांनी आणखीही काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्या गोष्टीही हेडलाईनमध्ये टाकणे जरा जास्त रिलेव्हंट झाले असते.

अंजना कश्यपला या गोष्टीची जरा जास्त मिर्ची झोंबलेली दिसतेय. अरविंद केजरीवाल हे जबाबदार मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. देशाचे भलेही स्मशानभूमीत रुपांतर होवो, पण आपल्या आकाची प्रतिमा मात्र मलिन होऊ नये. खरंच लाजिरवाणे आहे हे सगळं. आपल्या परखड स्वभावासाठी ओळखल्या जाणा-या स्वराचे हे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आहे.

 

News English Summary: Anjana Kashyap seems to be a little too chilly about this. Arvind Kejriwal is seen as the responsible Chief Minister. Even if the country is transformed into a cemetery, the image of our sky should not be tarnished. It’s all really embarrassing. This tweet of a voice known for its tough nature is currently in good discussion.

News English Title: Bollywood actress Swara Bhaskar slams news anchor Anjana Om Kashyap on debate issue news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या