21 April 2025 11:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

भारताला मजबूत सरकारची गरज आहे, मी महत्वाचा नाही, मी पुन्हा चहाचा स्टॉल उघडू शकतो - नरेंद्र मोदी

PM Narendra Modi

मुंबई, २४ एप्रिल: देशात कोरोना संक्रमित लोकांची संख्या पहिल्यांदा दोन लाखांपेक्षा जास्त नोंदवण्यात आली. त्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची मोकळीक आणि हलगर्जीपणामुळे दुसरी लाट ही अनियंत्रित झाली आहे. सरकार गर्दीच्या कार्यक्रमांवर बंधणे घालण्यात अपयशी ठरली. लस खरेदी करणे आणि व्हायरसच्या रिसर्चसाठी पैसे देण्याचे निर्णय उशीरा आले.

साथीच्या रोगाची दुसरी भयावह लाट केवळ भारतच नाही तर जगासाठीही विनाशकारी ठरू शकते. विषाणूच्या अनियंत्रित प्रसारामुळे धोकादायक नवीन स्ट्रेन उद्भवण्याचा धोका वाढत आहे. भारतात पहिल्यांदाच यूएस, ब्रिटनसह इतरही अनेक देशांमध्ये डबल म्युटंट ओळखल्या जाणार्‍या व्हायरसचा नवीन प्रकार आढळला आहे. भारताच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम जगाच्या इतर भागात लसींच्या पुरवठ्यावर झाला आहे. संक्रमण वाढल्यावर सरकारने व्हॅक्सीनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

दरम्यान, देशात सर्वच बाजूने मोदी सरकार देखील हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना संबंधित सर्व औषध, ऑक्सिजन, लस आणि इतर महत्वाची उपकरणं आणि त्यांचं नियंत्रण तसेच अधिकार स्वतःकडे ठेवून मोदी सरकार पूर्णपणे फासल्याचं पाहायला मिळतंय. विरोधकांकडून देखील मोदी सरकारवर आरोप सुरु झाले आहेत.

तत्पूर्वी २०१४ मध्ये म्हणजे मोदी सरकार येण्यापूर्वी देशात अशी कोणतीही गंभीर परिस्थिती नव्हती. केवळ लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे मोदी नवं नवे दावे करत होते. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर आणि प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर मोदी एक ट्विट केलं होतं आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की, “भारताला मजबूत सरकारची गरज आहे, नरेंद्र मोदी महत्वाचा नाही, मी काय परत जाऊन पुन्हा चहाचा स्टॉल उघडू शकतो” असं म्हटलं होतं. आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारची हतबलता पाहता तशी हिम्मत दाखवतील का अशी चर्चा त्यांच्या ट्विटची आठवण करून देताना समाज माध्यमांवर रंगली आहे.

 

News English Summary: India needs a strong Government Modi does not matter I can go back & open a tea stall. But the nation can’t suffer anymore said Narendra Modi in 2014 tweet gone viral on social media news updates.

News English Title: India needs a strong Government Modi does not matter I can go back & open a tea stall. But the nation can’t suffer anymore said Narendra Modi in 2014 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या