19 April 2025 3:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

HSC निकाल | बारावीसाठी 20:40:40 फॉर्म्युला | 3 वर्षांच्या गुणांवर निकाल | २ दिवसांत अंतिम निर्णय

HSC Result

मुंबई, २९ जून | राज्यातील इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता गुण देण्याचे सूत्र शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. १० वी, ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षा व प्रॅक्टिकलच्या आधारे हे गुण दिले जाणार असून त्यासाठी २०: ४०: ४० असा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती आहे. कोरोनामुळे राज्यात यंदाच्या शैक्षणिक सत्रात परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. १० वी इयत्ता १२ वीच्या परीक्षा महाराष्ट्राने रद्द केल्याची घोषणा ३ जून रोजी केली होती.

त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याबाबतचे सूत्र निश्चित करण्यास अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यावर तज्ज्ञांच्या अनेक बैठका होऊन फाॅर्म्युला निश्चित झाल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. इयत्ता १० वीचे २० टक्के गुण, इयत्ता १२ वीचे ४० टक्के गुण आणि इयत्ता १२ मधील अंतर्गत परीक्षा व प्रॅक्टिकल असे ४० टक्के गुण विचार घेतले जाणार आहेत.

या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ निकाल जाहीर करेल. यासंदर्भातली शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसांत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अंतिम निर्णय जाहीर करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्यात यंदा १२ वीचे १४ लाख विद्यार्थी आहेत. इयत्ता १० वी परीक्षा यंदा झालेली नाही. मात्र ११ वी प्रवेशासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाणार आहे. त्या परीक्षेसंदर्भात राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करते आहे. त्याची माहिती आठवड्यात जाहीर केली जाणार आहे.

सीबीएसईच्या धर्तीवरच सूत्र:
राज्य सरकारने सीबीएसईच्या सूत्रात थोडा बदल करून नवे सूत्र निश्चित केले. केंद्रीय बोर्डाने त्यांच्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १० वी (३०%, २४ थिअरी, २४ प्रॅक्टिकल गुण) ११ वी (३०%, २४ थिअरी, २४ प्रॅक्टिकल गुण) १२ वी (४०%, ३२ थिअरी, प्रॅक्टिकल ५२ गुण) असे सूत्र तयार केले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: State education minister Varsha Gaikwad will announce the formula of passing of HSC exam news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या