Relationship | मुली लवकर किंवा वेळेवर लग्न करायचं का टाळतात? | जाणून घ्या ही आश्चर्यकारक कारणे

मुंबई, २९ ऑगस्ट | वधू होणे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. प्रत्येक मुलीला असे वाटते की एक दिवस तिच्या स्वप्नांचा राजकुमार तिला सोबत घेऊन जाईल, पण काळाच्या ओघात मुलींची विचारसरणी सुद्धा खूप बदलली आहे. आजच्या आधुनिक काळात मुलींना वधू होण्यापेक्षा अविवाहित राहायचे आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आजकाल मुली विवाहित राहण्यापेक्षा अविवाहित राहणे का पसंत करतात.
मुली लवकर किंवा वेळेवर लग्न करायचं का टाळतात?, जाणून घ्या ही आश्चर्यकारक कारणे – Reasons behind delaying marriage for girls in India :
१. मुलींनी खूप शिक्षण आणि उच्च शिक्षण घेतलं असेल तसा तुल्यबळ शिकलेला नवरा मिळेपर्यंत मुली लग्नाला सहसा होकार देत नाहीत. तसेच अजून पुढे शिकण्याची इच्छा असल्यास संसाराची मंडळी त्याला राजी होतील की नाही याची शास्वती नसल्याने देखील मुली लवकर लग्न करणं पसंत करत नाहीत. तसेच लग्नानंतर एकाच वेळी घर, कार्यालय आणि भविष्यातील स्वप्नं कशी पूर्ण करायची त्यापेक्षा लग्न उशिरा केलेलं बरं असं समजून आलेल्या स्थळांना कोणत्या ना कोणत्या बहाण्याने नकार देणं पसंत करतात.
२. आजच्या काळात प्रत्येक मुलीला तिचे आयुष्य तिच्या पद्धतीने जगणे आवडते. त्यात चांगली मोठी पगाराची नोकरी करत असल्यास तसाच तुल्यबळ नवरा मिळेपर्यंत लग्न न करणं किंवा लग्नाला होकार न देणं अधिक पसंत करतात. त्यांनी स्वकर्तृत्वावर मिळवलेली आर्थिक संपन्नता त्यांना नवऱ्याकडून पहिल्या दिवसापासून अपेक्षित नसते आणि परिणामी लग्नाचा कालावधी लांबत राहतो.
3. लग्नानंतर मुलीला तिच्या आडनावापासून कपड्यांपर्यंत सर्व गोष्टींचा त्याग करावा लागू शकतो. तसेच हळूहळू त्यांच्या आवडी -निवडी बदलण्याच्या भीतीने जितकं शक्य होईल तेवढं लग्न करण्याचा विचार टाळण्याचा प्रयत्न करत असतात.
४. प्रत्येक मुलीला तिच्या आवडीचे कपडे घालायचे असतात, पण लग्नानंतर त्यावर बंधन येतील अशी शंका त्यांच्या मनात खुणावत असते. सासरी कोणी जुन्या विचारांचे किंवा टिपिकल मध्यम वर्गीय कुटूंबात बंधनं घालणारे असू शकतात असं त्यांना मनोमनी वाटत असतं. आई-वडिलांनी तर स्वतंत्र दिलं आहे, पण ते सासरी गेल्यावर मिळेल का याची सध्याच्या मुलींच्या मनात शंका असल्याने अघोषीतपणे लग्न टाळून आई-वडिलांकडे हौस-मौज पूर्ण करून घेऊन बर समाजात.
Why do Indian girls delay marriage :
5. ज्या मित्रांसोबत तुम्ही लहानपणापासून खेळत वाढता, लग्नानंतर तुम्हाला त्यांनाही विसरावे लागते. आपण आपल्या मित्रांसह काहीही शेअर करू शकत नाही किंवा त्यांच्याबरोबर बाहेर जाऊ शकत नाही तसे फिरून सिनेमा वगरे अशा गोष्टींचा आनंद घेऊ शकत नाही असं त्यांना वाटल्याने लग्न करणं टाळतात.
६. अनेक मुलींना त्यांचे अनेक कौटुंबिक प्रश्न असणं देखील उशिरा लग्न करण्यास कारणीभूत ठरतं. त्यामध्ये, आर्थिक जवाबदारी मुलीच्या खांद्यावर असणं, मुलीला भाऊ नसणं किंवा असेल तर तो कमावता नसणं. तसेच लग्न केल्यास माहेरचं अर्थकारण सांभाळण्यास सासरची मंडळी परवानगी देणार नाहीत या शंकेने अशा कौटुंबिक समस्या मुली उशिरा लग्न करणं पसंत करतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Article Title: Reasons behind delaying marriage for girls in India.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK