8 October 2024 11:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI च्या 'या' फंडामुळे गुंतवणूकदारांची रोज दिवाळी, पैसा 4 पटीने वाढतोय, फायदा घ्या - Marathi News NBCC Share Price | PSU शेअरने 250 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला, आता स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, मल्टिबॅगर शेअरवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ, 2800% परतावा देणारा शेअर BUY करावा की Sell - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर 50% पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News Vedanta Share Price | रॉकेट तेजीचे धावणार वेदांता शेअर, FII आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, ब्रोकरेज बुलिश - Marathi News
x

मुघल सम्राटांनी 1000 वर्षे राज्य केले असूनही भारतात हिंदु बहुमत कसे आहे? - नक्की वाचा

Mughal Empire in India

मुंबई, २९ ऑगस्ट | मुळात इस्लाम चा जन्म सातव्या शतकात झाला. मोहम्मइड पैगंबर 643 मध्ये मरण पावले. अशोक रांगणेकर सर म्हणतात तसे आजच्या भारतावर मुस्लिम 1000 वर्षांपासून नाही पण तर तेराशे वर्षापासून होते. खालील छायाचित्र सांगते की मोहंमेद पैगंबर यांनी किती प्रदेशांमध्ये मुस्लिम धर्माचा प्रसार केला. नंतरच्या इस्लामच्या प्रेषकानी राशीउद्दीन आणि उमैय्याड’ने किती भागात मुस्लिम धर्माचा प्रसार केला .राशीउद्दीन काळात आपल्या वर हल्ले झाले आणि काही भागात धर्मातरं चालू झाली. सातव्या शतकात सिंध भागात मुस्लिम धर्माचा प्रभाव खाली येऊ लागला.

मुघल सम्राटांनी 1000 वर्षे राज्य केले असूनही भारतात हिंदु बहुमत कसे आहे? – Mughal Empire in India still India has highest Hindu peoples :

Mughal Empire in India

वरील नकाशात दाखविल्याप्रमाणे गडद चॉकलेटी रंग जेथे पैगंबर यांचा प्रभाव असलेला, तर केसरी रंग राशीउद्दीन यांनी जिंकलेला आणि पिवळा रंग उममैय्याद रंग दर्शवतो. सिंध भागातील अनेक जाट हे मुस्लिम धर्मात धर्मांतरित झाले आणि बसरा मध्ये झालेल्या युद्धात अली इब्न च्या बाजूने भाग पण घेतला होता.

मोहंमद बिन कासीम ने सातव्या शतकात हल्ला केला. हिंदुस्थानात त्यावेळी काश्मीरचे ललितादित्य, राजपुताना मध्ये बाप्पा रावल चालुक्य चे विक्रमदित्य, नागभट्ट यशोवरमान आणि कैक हिंदू राज्यांनी 300 वर्ष सत्तेवर धाक ठेवला. पण ती परंपरा मोडीत निघाली. गझनीच्या मोहम्मद घुरी ने 17 वेळ हल्ला केला. पण नंतर पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाला.

आताचे पाकिस्तान किंवा पूर्वीचे भारतच सिंध आणि तिकडचा पंजाब मात्र गझनी काळापासून धर्मांतर करून ठेवले. त्याचाच परिणाम आज पाकिस्तान हा मुस्लिम बहुल झाला. म्हणजे सध्याच्या भारतात हिंदू बहुमत असलं तरी पण पाकिस्तान म्हणजे एके काळाचा हिंदू बहू प्रदेश नंतर मुस्लिम बहू प्रदेश झाला.

Mughal Empire in India :

घुरी घरांच्या नंतर खिलजी घराण्याने भारतावर सत्ता गाजवली. बखतीयार खलिजी ने पूर्व भारतात मिथे धर्माबतर केले. नंतर अनेक मुस्लिम राजवटी ने दिल्लीत राज्य केले. त्यात ममलूक, खिल्ली, ऐबक असे अनेक तुर्क सुलतान होते. मुस्लिम सत्तेत पण एकोपा नव्हता जसा हिंदूमध्ये एकोपा नव्हता. तुर्क विरुद्ध मुंघल, विरुद्ध पठाण विरुद्ध इराणचे शिया विरुद्ध काळे सिद्दी, त्याशिवाय उत्तरी विरुद्ध दक्खनी असा पण प्रकार होता.

याच सुलतानमध्ये अनेक नातेवाईक एकमेकांविरोधात सत्ता स्पर्धेसाठी संघर्ष करत होते. त्यामुळे यावनी सत्तेला जरी हिंदू आवडत नव्हता, तरी आंतरिक संघर्षामुळे त्यांना गरज भासायची. सतराव्या शतकात मराठ्यांच्यानंतर शिखांचा अधे मध्ये जाट, पंधराव्या शतकात विजय नगर, तामिळनाडू आंध्र मध्ये अनेक हिंदू शासन होते तसेच म्हैसूरचे राजे देखील हिंदू होते. म्हणजे मुस्लिम शासकांना कधीच पूर्ण भारतावर सत्ता काबीज करता आली नाही.

पण बाराव्या शतक पासून पाचशे वर्ष मुघल तुर्क’कडे दिल्ली राहिली, तरी खुद्द अकबरला हिंदूंची गरज लागली. औरंगझेब एकच कट्टर राज्यकर्ता होता, पण त्याला मराठयानी संपवला आणि दक्खन मध्ये थडगे उभे केले. औरंगझेबनंतर ब्रिटिशांपर्यंत मुस्लिम सत्तेचा पुन्हा अंत झाला. ब्रिटिशांनी देखील मुस्लिम शासकांना वर येऊ दिले नाही. निझामची सार्वभौमत्व टिकले, पण ते सुद्धा त्यांच्या प्रत्येक आज्ञेला हो म्हणायचे. पण हिंदू जरी बहुमताने असला तरी मुस्लिम शून्यापासून पासून 13% वर गेले हे ही थोडके नसे असं इतिहासाचे जाणकार सांगतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mughal Empire in India still India has highest Hindu peoples.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x