Bihar Election | RJD सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीर सोडून बिहारमध्ये आश्रय घेतील
पाटणा, १४ ऑक्टोबर : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. याच दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. नित्यानंद राय यांनी बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा (आरजेडी) विजय झाल्यास दहशतवादी काश्मीरमधून बिहारमध्ये आश्रय घेतील अशी भीती व्यक्त केली आहे. नित्यानंद राय यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
वैशाली जिल्हातील महनारमध्ये एका प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी लोकांना संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. “बिहारमध्ये आरजेडी सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीरमधून पलायन करुन बिहारमध्ये आश्रय घेतील” असं नित्यानंद राय यांनी म्हटलं आहे. राय यांच्या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आरजेडी प्रवक्ता अन्वर हुसैन यांनी भाजपा नेते भीतीपोटी अशी वक्तव्यं करत असल्याची टीका केली आहे.
#VIDEO – RJD सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीर सोडून बिहारमध्ये आश्रय घेतील pic.twitter.com/PYmdj4RC8X
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) October 14, 2020
News English Summary: Union Minister of State for Home Affairs Nityanand Rai courted controversy after he stated that terrorists from Kashmir would come and take shelter in Bihar if the RJD wins the upcoming Assembly election in the state. Rai, a BJP leader, made the remark while addressing a rally in Vaishali’s Mahanar constituency. His comment on October 12 was much similar to the 2015 statement of a prominent BJP leader who had said ‘if Mahagathbandhan wins the election, crackers will be burst in Pakistan’.
News English Title: Bihar Elections 2020 Union minister Nityanand Rai controversial statement says if RJD will won terrorist will take shelter in Bihar News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले सकारात्मक संकेत, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा