18 April 2025 5:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला फारसे गांभीर्य नाही | कपिल सिब्बल यांची टीका

Congress leader Kapil Sibal, Rahul Gandhi

पाटणा, १५ नोव्हेंबर: बिहारमधील एनडीएच्या यशानंतर आणि बिहार मध्ये जेडीयूला (Bihar Assembly Election 2020 Result) नुकसान होऊन देखील सत्ता गमावावी लागल्याने महागठबंधनमध्ये (Bihar Assembly Election 2020 Congress RJD MahagathBandhan) आरोप प्रत्यारोप सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसमुळे थोडक्यात सत्ता हातची गेल्याने आरजेडीचा संताप होतं असल्याचं वारंवार दिसत आहे. आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी (RJ Senior Leader Shivanand Tiwari ) यांनी थेट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या (Congress MP Rahul Gandhi ) कार्यशैलीमुळे भारतीय जनता पक्षाला मदत मिळतेय, असा गंभीर आरोप शिवानंद तिवारी यांनी केला.

बिहारमध्ये आरजेडीचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या एकंदरीत मानसिकतेवर शिवानंद तिवारी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बिहार विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सिमलामधील निवासस्थानी सहलीसाठी गेले होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? सध्या ज्या प्रकारे काँग्रेस चालवली जात आहे त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होत आहे, असा आरोप देखील तिवारी यांनी केला.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या २२ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. आता द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे की बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्येही हेच घडले होते. तर उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतही काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना दोन टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे जनमताचा संदेश स्पष्ट आहे की त्यांनी आपल्याला नाकारले आहे असं देखील कपिल सिब्बल म्हणाले आहेत.

“बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला फारसे गांभीर्य नाही. या पराभवानंतर पक्ष नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर आलेले नाही. कदाचित सगळं काही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे असे पक्ष नेतृत्वाला वाटत असावे” अशी टीका देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केली.

 

News English Summary: On the other hand, a few days back, 22 senior Congress leaders, including Kapil Sibal, had written a letter to Sonia Gandhi expressing their displeasure. Now, in an interview to The Indian Express, Kapil Sibal has said that not only Bihar but also the people of the country where by-elections were held have rejected the Congress. Therefore, the message of the people is clear that they have rejected him, said Kapil Sibal.

News English Title: Congress leader Kapil Sibal Says Leadership is not taking up issues polls show congress is not choice of people news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या