21 April 2025 3:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

मोठा संभ्रम | पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रानं जाहीर केलेली ७०१ कोटीची मदत 2020 सालची

Minister Dada Bhuse

मुंबई, २८ जुलै | काल केंद्र सरकारने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०१ कोटीची मदत जाहीर केल्याचं वृत्त झळकलं. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केंद्राच्या तत्परतेचे गोडवे गाण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता आलेल्या वृत्ताप्रमाणे मोठा संभ्रम झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण स्वतः राज्य सरकारकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

मोदी सरकारकडून महाराष्ट्र सरकारला एकूण ७०१ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत 2020 सालची आहे. जूनते ऑक्टोबर 2020 मध्ये अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी आम्ही 3 हजार 701 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. मोदी सरकारने काल त्यातील 701 कोटी रुपये आता दिले आहेत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. 2020 चे उरलेले 3 हजार कोरी लवकर मिळतील अशी अपेक्षा देखील दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे.

आता महापुरामुळे झालेल्या नुकसानाचा घोषवारा केंद्र सरकारला कळवला जाईल. ती मदतही केंद्र सरकार लवकर करेल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने जाही केलेली मदत ही आताच्या नुकसानासाठी नाही, असं दादा भुसे म्हणाले. या महापुरामुळे राज्यातील 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी अजूनही पुराचं पाणी आहे किंवा तिथे जाण्यात अडचणी येत आहे. तिथले पंचनामे होणं बाकी आहे. त्यामुळे हा आकडा वाढणार आहे. यात भात, ऊस, कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचं नुकसान झालं आहे, असं दादा भुसे म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Agriculture minister Dada Bhuse expects early help from the central government for flood victims news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#DadaBhuse(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या