20 April 2025 8:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार - पंतप्रधानांची घोषणा

Central Government, Garib Kalyan Rozgar Yojana scheme, PM Narendra Modi

नवी दिल्ली, २० जून : ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘गरीब कल्याण रोजगार योजना’ आखली आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी या योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली.

बिहारमधील खगरियामधून अभियांचा शुभारंभ करण्यात आला. ”लॉकडाउनमुळे अनेक मजुरांचे हाल झाले. त्यामुळे अनेक मजूर आपापल्या गावी परतले. यामध्ये बऱ्याच मजुरांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे स्थलांतरामुळे ज्या लोकांचे काम सुटले त्यांना आता रोजगार मिळणार” असल्याचं मोदींनी म्हटलं. तसंच या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना घरा जवळ काम मिळावं, असा आमचा हेतू आहे. आतापर्यंत मजुरांनी त्यांच्या कौशल्याने व श्रमाने शहरांना झळाळी दिली. मात्र आता ते गावांसाठी करावे, असं आवाहन देखील मोदी यांनी केलं आहे.

“आजचा दिवस ऐतिहासिक आहे. लॉकडाउनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छित आहे. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. आमचा प्रयत्न आहे की, या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना घरच्या जवळच काम मिळावं. आतापर्यंत तुम्ही तुमच्या कौशल्याने व श्रमाने शहरांना झळाळी देत होते. पण, ते आता गावांसाठी करावे,” असं आवाहन मोदी यांनी केलं.

लॉकडाउन लागू केल्यानंतर विविध राज्यात काम करणारे लाखो मजूर आपापल्या घरी परतले. घरी परतल्यानंतर या मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं आहे. या अभियानासाठी ५० हजार कोटी रूपयांची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यातून रस्ते बांधणीसह ग्रामविकासाला साहाय्यभूत ठरणाऱ्या कामातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

 

News English Summary: To increase employment opportunities in rural areas, the Central Government has launched the ‘Garib Kalyan Rozgar Yojana’. Against this backdrop, the scheme was inaugurated by Prime Minister Narendra Modi on Saturday. Modi announced that those who have lost their jobs due to this migration will get employment.

News English Title: Central Government has launched the Garib Kalyan Rozgar Yojana scheme by Prime Minister Narendra Modi News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या