सोशल मीडिया, फेक न्यूजमार्फत बेरोजगारांचे लक्ष काही काळासाठी इतरत्र वळवता येईल पण...

मुंबई, २५ ऑक्टोबर: एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये रघुराम राजन यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. देशातील बेरोजगारीचे वाढते प्रमाण आणि तरुणांच्या आयुष्यावर होणाऱ्या दूरगामी परिणामांवर त्यांनी सखोल भाष्य यावेळी केलं. आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत आयातीपेक्षा निर्यातीवर भर देण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांबद्दलही राजन यांनी इशारा दिला. निर्यातीला प्राधान्य देण्याचे प्रयत्न यापूर्वीही देशात झाले असून ते आतापर्यंत अयशस्वी ठरले आहेत, याकडेही राजन यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत आयातीवरील अवलंबित्व कमी करून निर्यातीला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. मात्र, हे धोकादायक असून त्यामुळे नवीन रोजगारनिर्मिती होणार नाही आणि पर्यायाने संतप्त तरुणांचा उद्रेक होईल, असा इशारा आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.
Message to #SPJIMR students from former RBI Governor Dr. Raghuram Rajan, in the CFS #webinar held on 21st October, where he was in conversation with SPJIMR Prof. @ananthng.
Watch the entire webinar recording here:https://t.co/g9o0VLh7wi #IamSPJIMR #IndianEconomy #Finance pic.twitter.com/YEZQ1ygY3J— SPJIMR, Mumbai (@SPJIMR) October 24, 2020
सोशल मीडिया आणि फेक न्यूज यांचा वापर करून लक्ष विचलित करता येते, मात्र अखेरीस असे प्रयत्न अपयशी ठरतात, असे सूचक विधानही रघुराम राजन यांनी या वेळी केले. बेरोजगार तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवता येईल पण ते फारच अल्प काळासाठी. जर त्यांना रोजगार मिळाला नाही तर ते अखेर रस्त्यावर उतरतील, असे राजन म्हणाले.
निर्यातीचे प्रमाण वाढवायचे असेल तर आयातही वाढली पाहिजे. देशातील निर्यातदारांना आपली निर्यात स्वस्त ठेवण्यासाठी आयात करण्याची गरज असते. चीनने इतर देशांतून विविध कच्च्या मालांची आयात केली आणि त्याचा वापर करून उत्पादित केलेल्या मालाची निर्यात केली. त्यामुळे चीन हा सर्वांत प्रबल निर्यातदार देश बनला, असे राजन यांनी सांगितले. देशांतर्गत उत्पादनासाठी कमी शुल्क आकारून उत्पादननिर्मितीला पोषक वातावरण तयार केले पाहिजे, असे मतही राजन यांनी या वेळी व्यक्त केले.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली होती. त्यावेळी, आत्मनिर्भर भारतवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत इशाराही दिला होता. “यापूर्वीही अशाप्रकारच्या धोरणांचा अवलंब केला गेला होता. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. आत्मनिर्भर भारतातून सरकारला नक्की काय म्हणायचं आहे हेदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जर हे उत्पादनासाठी वातावरण तयार करण्याविषयी असेल तर ते ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम सादर करण्यासारखंच आहे,” असं राजन म्हणाले.
“जर हा संरक्षणवादाचा मुद्दा असेल तर दुर्दैवाने भारताने अलीकडेच दरवाढ केली आहे. मला वाटतं की या मार्गाचा अवलंब करण्यात काहीही अर्थ नाही, कारण आपण यापूर्वीच तसा प्रयत्न केला आहे. यापूर्वी आपल्याकडे लायसन्स परमिट व्यवस्था होती. संरक्षणवादाची ती पद्धत समस्या निर्माण करणारी होती. त्यामुळे काही कंपन्यांना फायदा झाला, परंतु काहींसाठी ते समस्या निर्माण करणारे ठरले,” असं राजन म्हणाले होते. भारताला शिक्षण क्षेत्रात अधिक मेहनत करण्याची गरज आहे. आपण अन्य देशांना शिक्षण उपलब्ध करून देऊ शकू असंही राजन यांनी नमूद केलं होतं.
News English Summary: The Modi government has decided to give priority to exports by reducing its dependence on imports under the Self-Reliance India initiative. However, it is dangerous as it will not create new jobs and alternatively there will be an outbreak of angry youth, warned former RBI governor Raghuram Rajan. The use of social media and fake news can be distracting, but in the end such attempts fail, Raghuram Rajan said. Unemployed youth can be diverted but only for a very short time. If they don’t get employment, they will eventually take to the streets, Rajan said.
News English Title: Former RBI governor Raghuram Rajan said giving priority to exports over imports is dangerous there will be an outbreak of youth News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON