23 February 2025 7:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

एअर इंडियाला खरेदीदार न मिळाल्यास कायमची बंद करणार | मोदी सरकारची माहिती

Modi Government,  Shut Down Air India, Hardeep Singh Puri, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर : सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी एअर इंडियासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे. शक्य झाल्यास सरकार ही कंपनी सुरु ठेवेल. मात्र कंपनीवर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच या कंपनीचे खासगीकरण किंवा ती बंद करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. विमान संशोधन विधेयक २०२० राज्यसभेमध्ये सादर करण्याआधी पुरी यांनी सभागृहाला ही माहिती दिली. एकीकडे कंपनी बंद करण्याचे वक्तव्य करतानाच दुसरीकडे पुरी यांनी या कंपनीला लवकरच नवा मालक मिळेल आणि त्याचे उड्डाण यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार २०११-१२ पासून आतापर्यंत केंद्र सरकारने एअर इंडियामध्ये ३० हजार ५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही कंपनी विकल्यानंतरही सरकारला फारसा फायदा होणार नाही. हवाई क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ कपिल कौल यांनी लाइव्ह मिंटला दिलेल्या माहितीनुसार या कंपनीच्या विक्रीतून सरकारला फार काही मिळण्याची अपेक्षा नाहीय. सध्या उपलब्ध निधी आरोग्य, शिक्षण, बांधकाम यासारख्या इतर महत्वाच्या गोष्टींसाठी वापरण्याचा सरकारचा विचार आहे.

एअर इंडियाच्या डोक्यावरील तब्बल २८ हजार कोटींच्या कर्जाचा बोजा हा कंपनीच्या विक्रीतील सर्वांत मोठा अडथळा ठरत आहे. कर्जासह कंपनीची मालमत्ता देण्याची अट दूर करण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. त्यामुळे अधिकाधिक खरेदीदार पुढे येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानंतरही खरेदीदार पुढे न आल्यास कंपनी बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जाते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार सरकारने कर्जाची अट दूर करण्यासाठी नियमांमध्ये आवश्यक ते बदल करावे, असे सुचविण्यात आले आहे.

त्यामुळे खरेदीदारांवर येणारा ३.३ अब्ज डॉलरचा बोजा कमी होईल असा अंदाज आहे. एअर इंडियाची विक्री २०१९ अखेर होणे अपेक्षित होते. केंद्र सरकारने लिलावाला बोली लावण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी वाढवून दिला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रसार झाल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली. हवाई वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या पूर्वीच एअर इंडियाला योग्य खरेदीदार न मिळाल्यास कंपनी बंद करावी लागेल, असे संसदेत सांगितले होते.

 

News English Summary: India is proposing to drop a condition that the winning bidder for Air India Ltd. will have to take on $3.3 billion of aircraft debt, people with knowledge of the matter said, as the government struggles to sell the loss-making carrier kept afloat by taxpayer-funded bailouts. Prime Minister Narendra Modi’s administration is being advised to drop the rule on concern it will deter buyers, the people said, asking not to be identified as the proposal isn’t public.

News English Title: Government Will Shut Down Air India If Not Privatized Hardeep Singh Puri Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x