17 April 2025 5:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

हल्ल्यानंतर किती ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दलाचे नाही, ते सरकारचे काम

Pakistan, IAF, PAF, Pulawama Attack

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेली कारवाई कितपत परिणामकारक ठरली यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यावर वायुदल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी ध्येयावर थेट प्रहार केल्यानंतर त्यात किती जण मारले गेले ते मोजण्याचे काम वायुदल करत नाही. ते काम सरकारचे असते त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आम्ही केवळ ठरवलेल्या लक्ष्यावर प्रहार झाला की नाही, ते आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे असे धनोआ यावेळी म्हणाले. भारतीय वायुदलाने जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेला हल्ला तसेच पाकिस्तानच्या ताब्यातून विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका झाल्यानंतर आज पहिल्यांदा हवाई दल प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली.

आम्ही लक्ष्य ठरवल्यानंतर केवळ त्यावरच प्रहार करतो. पाकिस्तानातील बालकोटमध्ये आम्ही लक्ष्यावर अचूक प्रहार केला. जर आम्ही जंगलामध्ये बॉम्ब टाकले असते तर मग पाकिस्तानने त्यावर प्रतिक्रिया का दिली? असा थेट सवाल हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी उपस्थित केला. मिग-२१ बायसन हे पूर्णपणे सक्षम विमान आहे. ते अपग्रेड करण्यात आले आहे. चांगल्या दर्जाच्या रडारसह, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आणि चांगल्या शस्त्रास्त्रांनी हे विमान सुसज्ज आहे असे हवाई दल प्रमुखांनी सांगितले.

एक ठरवलेले ऑपरेशन असते. ज्याचे नियोजन तुम्ही करता आणि ते प्रत्यक्षात आणतो. परंतु जेव्हा शत्रू तुमच्यावर हल्ला करतो तेव्हा उपलब्ध असलेल्या प्रत्येक फायटर विमानाकडून उत्तर दिले जाते. मग ते फायटर विमान कुठलेही असो. आपली सर्व फायटर विमाने शत्रूचा मुकाबला करण्यास सक्षम आहेत असे हवाई दल प्रमुखांनी सांगितले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#India Pakistan(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या