17 April 2025 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

तुम्ही बँकेत किमान रक्कम न ठेवल्याने बँका मात्र मालामाल

नवी दिल्ली : तुम्ही तुमच्या बँक खात्यात किमान रक्कम ठेवली नसेल कदाचित, परंतु त्यामुळे ग्राहकाला जरी दंड बसला असेल तरी बँकांची मात्र तुफान चांदी झाल्याचे समजते. कारण किमान रक्कम न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून बँकांनी दंडापोटी तब्बल ५,००० कोटी रुपयांची रक्कम वसूल केली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांनी बँक खात्यात आवश्यक रकमेपेक्षाही कमी पैसे ठेवणाऱ्या ग्राहकांकडून हा मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.

दंड वसुली करणाऱ्या या बँकामध्ये २१ सरकारी आणि ३ मोठय़ा खासगी बँकांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक वसुली एसबीआयने म्हणजे तब्बल २,४३४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो एचडीएफसी बँकेचा कारण त्यांनी ५९० कोटी रुपये दंड ग्राहकांकडून वसूल केला आहे. त्यानंतर ऍक्सीस बँक ५३० कोटी रुपये तर आयसीआयसीआय बँकेने ३१७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

स्टेट बँकेच्या नव्या नियमाप्रमाणे मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या स्टेट बँकेच्या खातेदारांना आपल्या खात्यात किमान रक्कम ३, ००० रुपये ठेवणं आवश्यक असते. परंतु, जर ग्राहकाने खात्यात २, ९९९ ते १,५०० रुपये किमान रक्कम असेल तर एसबीआय ३० रुपये दंड आकारतं. तर, किमान रक्कम १४९९ ते ७५० रुपयांपर्यंत असेल तर एसबीआय खातेदारांकडून ४० ते ५० रुपये दंड आकारतं.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Arun Jaitley(19)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या