महत्वाच्या बातम्या
-
मुंबई मेट्रो ३ BKC | भाजपचा तिळपापड | हे आहे भाजपचं गुजरात आर्थिक कनेक्शन
राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर ठेवून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात सरकार स्थापन करण्यात आल्यावर भारतीय जनता पक्षाची पडद्यामागील अनेक गुपितं समोर येण्यास सुरुवात झाली आहे. प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या आंदोलनातील आणि नाणार संबंधित प्रकल्पांना लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्यांवर जे गुन्हे लादले होते ते मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारने राज्यात सुरु केलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही | राज्य बुडवायला निघालेत - फडणवीस
कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. सल्लागार राज्य बुडवायला निघाले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
बुरे दिन आने वाले है | पेट्रोलची किंमत 100 रुपये पर्यंत पोहोचण्याची शक्यता
पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलग दहाव्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. थंडीची लाट आल्याने तापमान सामान्य ठेवण्यासाठी काही देशांमध्ये सेंट्रलाइज हिटिंग सिस्टम सुरु करण्यात आली आहे. या प्रणालीसाठी इंधनाची गरज लागते.त्यामुळे मागील दोन दिवसांपासून कच्च्या तेलाची मागणी वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुकेश अंबानींची भूक वाढली आहे | त्यासाठी शेतकऱ्यांवर विधेयके लादली
मोदी सरकारचे कृषी कायदे हे अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. मुकेश अंबानी यांची भूक वाढली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके लादली जात असल्याचा आरोप खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | Jio चा इतर टेलिकॉम कंपन्यांसोबत वाद पेटला
रिलायन्स जिओ इंफोकॉमने (Reliance Jio Infocom-RJio) एयरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडियावर (VI) खोट्या बातम्या पसरवण्याचे आरोप केले आहेत. कंपनीने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडे (TRAI) कडक कारवाईची मागणी केली आहे. जिओचा असा आरोप आहे की, एयरटेल आणि वोडाफोन-आयडियाने शेतकरी आंदोलनादरम्यान अनैतिकरित्या अशा अफवा पसरवल्या की, नव्या कृषी कायद्यामुळे जिओला फायदा होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
४०% मालवाहतुक प्रभावित | ५ हजार कोटींचा व्यापार प्रभावित | ट्रेडर्सचा केंद्रावर संताप
राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर कृषी विधेयकाविरोधात शेतकरी ठाण मांडून बसलाय. शेतकरी आंदोलनाचा आज २१ वा दिवस… परंतु, या शेतकऱ्यांच्या अडचणीत दिल्लीतील थंडी आणखीनच वाढ करणार असं दिसतंय. दिल्लीमध्ये पारा ४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला दिसतोय. यामुळे, करोना संक्रमण काळात आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना आणखीनच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
अदानी, अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे शेतकऱ्यांना तुकडे-तुकडे गँग म्हणत आहेत - प्रशांत भूषण
काल शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. भारतीय जनता पक्ष देशातील खरी तुकडे-तुकडे गँग असून शेतकरी आंदोलनादरम्यान देश तोडल्याचा आरोप सुखबीर सिंग बादल यांनी केला होता. भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय एकताचे तुकडे केले आहेत, निर्लज्जपणे मुस्लिमांविरूद्ध हिंदूंना भडकावले आहे. आता ते आपल्या शीख बांधवांच्या विरोधात असे करत आहेत. देशप्रेमी पंजाबला भाजपा जातीय आगीत ढकलत आहे, असा शब्दात सुखबीर सिंग बादल यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला होता.
4 वर्षांपूर्वी -
Facebook Fuel for India 2020 | मार्क झुकरबर्ग भारतीय तरुणांसाठी रोल मॉडेल - मुकेश अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी Facebook Fuel for India 2020 मध्ये म्हणाले, ‘भारतात अनेक कंपन्या आणि संघटना डिजीटल इनक्ल्यूजन (समावेश) च्या दिशेने जलद गतीने काम करत आहेत. भारतातल्या तरुणांची डिजीटल परिवर्तनामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना भारताचे तरुण रोल मॉडेल म्हणून बघतात.’
4 वर्षांपूर्वी -
अब की बार, लक्षच देईना मोदी सरकार | गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
कोरोना आपत्तीमुळे लॉकडाउनच्या संकटात सापडलेल्या सामान्य लोकांची आर्थिक स्थिती बेताची झालेली असताना इतर गोष्टी देखील महाग झाल्या आहेत. मोदी सरकारने ज्या मुद्यांवरून निवडणुका जिंकल्या त्याच मुद्यावर सरकार लक्ष द्यायला देखील तयार नसल्याने सामान्य लोकांची स्थित बिकट होतं चालली आहे. त्यात रोजच्या जीवनातील महत्वाचा असणाऱ्या गॅसचे दर देखील गगनाला भिडले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती | तर भारत आशियातील सर्वात गरीब देश....हा?
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ आणि मार्क झुकरबर्ग यांची फेसबुक या कंपन्यांमध्ये भागीदारीचा करार झाल्यानंतर अंबानी पुन्हा एकदा आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकले आहे. फेसबुकबरोबर झालेल्या व्यवहारामुळे मुकेश यांची संपत्ती ४ अब्ज डॉलरने वाढून ४९ अब्ज डॉलवर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नवीन वर्षात Cheque पेमेंटचा नियम बदलणार | नेमके असतील बदल?
कोरोनाच्या संकटामध्ये मागील काही दिवसांमध्ये बँकिंग क्षेत्रातील घोटाळे (Banking Fraud) मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. अशात ग्राहकांची होणार फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 जानेवारी 2021 पासून धनादेशासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन वर्षात चेक (Cheque) पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती आहे. खोट्या चेकद्वारे होणारा बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
EPF वरील 8.5% व्याजाची रक्कम | डिसेंबर अखेरपर्यंत तुमच्या खात्यात जमा होऊ शकते
ईपीएफओच्या (EPFO) तब्बल सहा कोटी ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना डिसेंबर 2020 च्या अखेरपर्यंतच्या आर्थिक वर्ष 2019-20 साठी सुमारे सहा कोटी भागधारकांच्या कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये (Employees’ Provident Fund Organization) 8.5 टक्के व्याज (Total Interest) जमा करण्याची शक्यता आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये, ईपीएफओने दोन हप्त्यांमध्ये हे व्याज देण्याचे ठरविले होते. पहिल्या हप्त्यात 8.15 टक्के आणि दुसर्या हप्त्यात 0.35 टक्के व्याज दिले जाणार होते. मात्र प्रसार माध्यमांच्या हाती आलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने एकत्रच व्याज देण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठविला आहे. अर्थ मंत्रालय काही दिवसांत हा प्रस्ताव मंजूर करू शकेल. अशा प्रकारे, या महिन्याभरात संपूर्ण व्याज दिले जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | टपाल जीवन विमा मुंबईत मुलाखतीतून भरती | शिक्षण 10 वी पास
टपाल जीवन विमा मुंबई येथे अभिकर्ता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 ते 17 डिसेंबर 2020 आहे.
4 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानचं स्वत:चेच जगात क्रेडीट नाही | त्यांचे क्रेडीट कार्ड घेऊन मी काय करणार?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांनी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (Privilege Motion) दाखल केला आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्धही सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वत: ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2020 (Maharashtra Legislature Winter Session 2020 आजपासून सुरु झाले. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
कंगना रनौत आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात आ. सरनाईकांकडून हक्कभंग प्रस्ताव
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांनी अभिनेत्री कंगना रनौत (Bollywood Actress Kangana Ranaut) यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (Privilege Motion) दाखल केला आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्धही सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वत: ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2020 (Maharashtra Legislature Winter Session 2020 आजपासून सुरु झाले. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस काही सुचवूत आहेत का | दरेकरांना ताब्यात घेण्यासाठी फडणवीसांकडे पुरावे असतील तर द्यावेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षांवर देखील जोरदार निशाणा साधला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल उपस्थित केला
4 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानचं क्रेडिट कार्ड | आणि शिवसेनेच्या 'त्या' नेत्याचा घरचा पत्ता
गेल्या महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापा टाकला होता. त्यावेळी प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग सरनाईक यांच्या घरीही ईडीच्या पथकाने चौकशी केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. अद्यापही ही चौकशी चालू असून आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधार कार्ड डाऊनलोड करण्याचा सर्वात सोपा मार्ग | केवळ ४ स्टेप्स
आपला अर्ज यूआयडीएआयद्वारा मंजूर झाल्यानंतर तो आपल्या मोबाइलवर अद्ययावत होतो. यानंतर आपण आपले आधार कार्ड डाऊनलोड करू शकता आणि मुद्रित करू शकता. आपण आपले कार्य करू शकता. आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक देखील आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधार कार्डला पॅन लिंक केलात का? | डेडलाईन जवळ | अन्यथा 10 हजाराचा दंड
PAN Card म्हणजे कायमस्वरूपी खातं क्रमांक म्हणजेच स्थायी खाते क्रमांक. सध्याच्या सगळ्या आर्थिक आणि बँकेशी निगडिक व्यवयायामध्ये पॅनकार्ड महत्त्वाचं असतं. मग ते एखाद्या बँकेत खातं उघडण्याचं काम असो किंवा व्यवसाय सुरू करण्यापर्यंत पॅनकार्ड सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे. PAN नंबरद्वारे केलेले आर्थिक व्यवहार वैध मानले जातात. अनेक यामुळे मोठी फसवणूकही टाळता येते. पॅनकार्डच्या वापरामुळे भविष्यात कायदेशीर अडचणीत येण्याची शक्यता कमी असते. पण या सगळ्यात पॅनकार्ड (PAN Card) आधार कार्डशी जोडलेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचंही पॅनकार्ड आधार कार्डशी (Aadhar Card) जोडलेलं आहे का?
4 वर्षांपूर्वी -
मी कृषी क्षेत्राच्या विकासाआड येणाऱ्या सर्व भिंती पाडतोय - पंतप्रधान मोदी
केंद्र सरकारच्या तीन तृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आता आपला लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार असल्याचं दिसत आह. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बलबीर, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी दिल्ली-जयपूर रस्ता रोखण्यात येणार आहे. इतकंच नाही तर उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर निदर्शनंदेखील करण्यात येणार आहे. यावेळी टोल प्लाझादेखील रोखण्यात येईल. यामध्ये केएमएससी नेत्यांच्या अंदाजाप्रमाणे सुमारे 30,000 शेतकरी ट्रॅक-ट्रॉलीसह दाखल होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON