महत्वाच्या बातम्या
-
अर्थव्यवस्थेला तब्बल ७ ते ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज
देशात केंद्र सरकारकडून २५ मार्चपासून राबवण्यात येत असलेले २१ दिवसांचे लॉकडाऊन आज, मंगळवारी संपत आहे आणि तो यापुढे देखील ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था पार खिळखिळी झाली असून विश्लेषकांच्या मते, अर्थव्यवस्थेला ७ ते ८ लाख कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
टाटा स्टील पगार व कामगार कपात करणार नाही; पण इंडियाबुल्स'कडून पगार कपात
कोरोना व्हायरसमुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था थांबली आहे. कोरोनाचा शॉक भारतीय अर्थव्यवस्थेला बसेल आणि विकास दर २.८ टक्क्यांवर येण्याची शक्यता असल्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. याचा फटका अनेक उद्योगांना बसणार आहे. काही उद्योगांमध्ये कर्मचारी आणि पगार कपात करण्याचे संकेत मिळत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
५ लाख रुपयांपर्यंतचे प्रलंबित IT रिटर्न आणि GST रिटर्न त्वरीत जारी केले जाणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना व्हायरसच्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. करदात्यांना त्यातून मोठा दिलासा देण्यात आला होता. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत अर्थमंत्र्यांनी वाढवली होती. या महासाथीच्या संकटामुळे जगभरावर आर्थिक संकट ओढवलं आहे. भारतातही अनेक उद्योगांचं, व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
भारतात लॉकडाऊन वाढत राहिल्यास भयानक आर्थिक परिणाम होतील: जागतिक बँक
जागतिक बँकेने रविवारी दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थेवर ताजा अहवाल सादर केला. या अहवालात २०१९-२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ५ टक्के इतका राहील असे म्हटले आहे. तर २०२०-२१ मध्ये या विकास दरात घट होऊन तो २.८ टक्के इतका असेल.
4 वर्षांपूर्वी -
PM फंड CSR; तर CM फंडाला वगळलं; आपत्तीत सुद्धा राजकारण; रोहित पवार संतापले
पीएम केअरला केलेली मदतच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) म्हणून ग्राह्य धरली जाणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केलेली रक्कम सीएसआरमध्ये मोजली जाणार नसल्याचं मोदी सरकारनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे २ आठवड्यानंतर केंद्रानं याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोना संकटाचा आपण एकत्रित मुकाबला करू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असताना पीएम आणि सीएम रिलीफ फंडाला केलेल्या मदतीत फरक करण्याचं कारण काय, असा सवाल कॉर्पोरेट क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
देव माणूस नाराज; समाज माध्यमांवर रतन टाटांच्या नावे खोटा लेख पसरवला
टाटा कंपनी आणि ग्रुप्सने यापूर्वीही देशावरील संकटात आपलं योगदान दिलं आहे. आताही, देशसेवेत योगदान देण्याची हीच ती वेळ आहे. सध्याच्या काळाजी गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच ती वेळ असल्याचे टाटा यांनी सांगितले होतं. टाटा समूहाकडून वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या खरेदींसाठी १५०० कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे पत्र रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीमुळे १९३० नंतर प्रथमच जगात महामंदी येणार - IMF
कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने राज्य हेल्थ सिस्टम सुधारण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण फंड देण्यास मंजूरी दिली आहे. यासाठी केंद्र सरकारने इंडिया कोव्हिड-१९ रिस्पॉन्स हेल्श सिस्टिम पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये खर्चासाठी देण्यात येणारी पूर्ण रक्कम केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य आर्थिक अडचणीत; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावं लागण्याची शक्यता
करोना विषाणूची साथ आणि त्यानंतर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका राज्य सरकारच्या तिजोरीला बसला आहे. त्यामुळं एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारला १५ ते २० हजार कोटींचं कर्ज काढावं लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग-बॉटलिंग, वस्त्रोद्योग उद्योगांना लॉकडाउन'मधून वगळण्याची मागणी
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशातील करोनाबाधितांचा आकडा आता ५ हजार ७३४ वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात करोनाने १७ चा बळी घेतला आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६६ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: देशातील ५२ टक्के नोकऱ्या जाऊ शकतात, CII सर्वेक्षण
कोरोना व्हायरस जागातील १७५हून अधिक देशांमध्ये फैलावला आहे. जगभरात कोरोना व्हायरसचे ५,२९,६१४ रुग्ण आढळून आले आहेत. तर १२१४५४ इतके रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाने जगातील मृतांचा आकडा २३७१४ पर्यंत गेला आहे. भारतात हा आकडा ४,४२१वर गेला आहे. तर १४४ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसमुळे जगभरातील आर्थिक उलाढाल अचानक ठप्प झाली आहे. यामुळे बाजारांना उभारी देण्यासाठी २५०० अब्ज डॉलरची आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज आहे. हा आकडा कमी आहे. आतापर्यंत ८० हून अधिक देशांनी IMF’कडे आपत्कालीन मदतीची मागणी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनंतर पंतप्रधान कार्यालयातून देशाचा कारभार चालवायचा हट्ट सोडा
भारतासमोर आधीच आर्थिक संकट गोंगावत असताना कोरोना व्हायरसने धडक दिली. कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाच्या दिशेने जाणाऱ्या भारताला मोठा फटका बसला आहे. अशातच आता रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी देशाला एका गंभीर धोक्याची जाणीव करून दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जनधन योजनेतील महिला लाभार्थ्यांना ५०० रु आणि SMS आला स्वस्थ रहा!
जनधन योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ५०० रुपयांची रक्कम ३ एप्रिलपासून त्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. बँक आपल्या खातेधारकांना एसएमएसच्या माध्यमातून सूचना देत आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या जनधन खातेधारकांना एसएमएस पाठवून दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, आम्हाला तुमची चिंता आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: विप्रोच्या अझिम प्रेमजी फाऊंडेशनकडून ११२५ कोटीची मदत
कोरोनाचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशननं कोट्यवधींचा निधी जाहीर केला आहे. विप्रो लिमिटेडनं १०० कोटी, विप्रो इंटरप्रायझेसनं २५ कोटी, तर अझिम प्रेमजी फाऊंडेशननं १००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरवर्षी विप्रो कंपनी आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशन काही रक्कम सीएसआरच्या माध्यमातून दान करते. मात्र ही रक्कम त्यातील नसून अतिरिक्त असल्याचं विप्रोनं निवेदनातून स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना इम्पॅक्ट : मुख्यमंत्र्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात
‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारत वगळता जगात मंदीचं सावट; पण त्याची कारणं संयुक्त राष्ट्रालाही माहित नाहीत
करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग या वर्षात मंदीचा सामना करणार आहे. काही ट्रिलियन डॉलरचं अर्थव्यवस्थांचं नुकसान होणार आहे. याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसणार आहे, पण चीन आणि भारताला याचा फटका बसणार नाही, असा दावा संयुक्त राष्ट्राच्या व्यापार अहवालातून करण्यात आला आहे. जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये राहत असून करोनामुळे अभूतपूर्व आर्थिक नुकसानीचा सामना करत आहे. यूएनने यातून सावरण्यासाठी २.५ ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजची गरज बोलून दाखवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पीएम रिलीफ फंड असताना 'पीएम-केअर' का? अनेकांकडून शंका उपस्थित
कोरोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन ट्रस्ट ‘पीएम-केअर’ वर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा ट्रस्ट निधी उभारण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून पीएम रिलीफ फंड किंवा पंतप्रधान मदत निधी अस्तित्वात असताना, पुन्हा ‘पीएम-केअर’ का असे गंभीर प्रश्न आतापासूनच उपस्थित होऊ लागले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चिंता मिटली! लॉकडाऊनमुळे हफ्ता चुकला तरी CIBIL वर परिणाम होणार नाही
करोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉक डाऊननंतर अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली. बँकेने प्रमुख व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे. व्याजदर कपातीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून गृह, वाहन यासह इतर कर्जांचा दर कमी होणार असून मासिक हप्त्याचा भार हलका होणार आहे. त्याशिवाय ३ महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अनेक कंपन्या दिवाळखोर होऊन कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याची लाट येणार: IMF प्रमुख
“संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं आता स्पष्ट झालं असून ही मंदी २००९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटापेक्षाही वाईट असेल”, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जीव्हा यांनी म्हटलंय. शुक्रवारी (दि.२७) एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना जॉर्जीव्हा यांनी करोना व्हायरसमुळे जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडल्याचं सांगत चिंता व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
बापरे! कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून अजून अतिरिक्त १००० कोटीची मदत
जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला असून जगभरात २४ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत भारतात साडेसातशेहून अधिक लोकांना करोनाचा लागण झाली आहे. लॉकडाऊनचा आज चौथा दिवस असून करोनाची आज काय स्थिती आहे, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
दानशूर रतन टाटा; कोरोनाशी लढण्यासाठी दिले ५०० कोटी दान
जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला असून जगभरात २४ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत भारतात साडेसातशेहून अधिक लोकांना करोनाचा लागण झाली आहे. लॉकडाऊनचा आज चौथा दिवस असून करोनाची आज काय स्थिती आहे, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
- Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
- Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News
- Nitanshi Goel | 'फुल कुमारीने' सांगितलं स्वतःच्या लांबसडक आणि सुंदर केसांचं रहस्यं; किचनमधील या गोष्टींचा करते वापर
- Niacinamide Serum | चेहऱ्यावरील काळे डाग गायब करेल एलोवेरा आणि ग्रीन टीपासून बनलेलं हे सिरम, एकदा वापरून पहाच
- Big Boss Marathi | शिवीगाळ करून BIP-BIP ऐकू येऊनही त्यावर शिक्षा तर सोडा; जानवी किल्लेकरच्या जाऊबाई संतापल्या
- Turmeric Facial Wax | कोणते वॅक्स चांगले? चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करेल हळद, वापरा हे 3 उपाय - Marathi News
- PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News
- Kawasaki Ninja Discount | जबरदस्त! कावासाकी बाईक खरेदीवर 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर, खरेदीला गर्दी
- Bigg Boss Marathi | झापूक-झुपुक अंदाज! 'हे घे चॉकलेट माझा बच्चा', सूरजने हाणला होता गुलिगत अंदाजात प्रपोज - Marathi News