महत्वाच्या बातम्या
-
सर्जिकल स्ट्राईक भारतीय लष्करानं केला, मोदींनी नव्हे: राहुल गांधी
वायुदलाने केलेला सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला नसून तो भारतीय लष्करानं केलं आहे. नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक आपल्या सरकारनं केल्याचं सांगत लष्कराचा अपमान करत आहेत, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
बेरोजगारीचा दर वाढून ८.४ टक्क्यांवर, देश भविष्यात बेरोजगारांची भूमी होतो कि काय?
एप्रिलमध्ये देशातील बेरोजगारीचा दर पूर्वीपेक्षा वाढून ८.४ टक्क्यांवर गेला आहे. ऑक्टोबर २०१६ नंतरचा हा सर्वोच्च बेरोजगारी दर ठरला आहे. मार्चमध्ये बरोजगारीचा दर ६.७ टक्के होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
तेलंगणा: मोदींविरोधात मैदानात उतरलेल्या २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज बाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरलेल्या तेलंगणाच्या तब्बल २४ शेतकऱ्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. निवडणूक आयोगाने एका शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे. आयोगाने ज्या एकमेव शेतकऱ्याचा अर्ज स्विकारला आहे त्यांचं नाव इस्तारी सुन्नम नरसईया असं आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘फनी’ चक्रीवादळ ओडिशा किनाऱ्यावर थडकलं! लाखोंचे स्थलांतर
सर्वाधिक घातक असे ‘फनी’ चक्रीवादळ आज सकाळी नऊच्या सुमारास ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ताशी १७५ किलोमीटरच्या वेगाने ‘फनी’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले असून अकरा नंतर फनीचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ओडिशासह आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना ‘फनी’चा फटका बसण्याचा अंदाज आहे. गृहमंत्रालयाकडून १९३८ हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. पुरी आणि भुवनेश्वरमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमरिकेचे परराष्ट्र सेक्रेटरी पॉम्पीओ यांच्या मसूद अझहर विषयक ट्विटने मोदी तोंडघशी
अमेरिकेचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी अध्यक्ष माईक पॉम्पीओ यांनी मसूद अझहर विषयक एक ट्विट केल्याने नरेंद्र मोदी तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे. भारतात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि विशेष करून मोदी ‘जैश ए मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहर याला आमच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने आंतरराष्ट्रीय दहशदवादी घोषित केल्याच्या बाता मारून, प्रचारात स्वतःची पाट थोपटून घेत असल्याचे काल पासून पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
संतापजनक: कर्जमाफीमुळे शेतकरी सुस्तावतात; भाजप हरियाणाचे मुख्यमंत्री
एखाद्याला मोफत देण्याची सवय लावली, की मग ती व्यक्ती आळशी होते, अशा शब्दांत त्यांनी कर्ममाफीवर भाष्य केलं. ‘हरियाणातल्या शेतकरी समुदायाला त्यांच्या पुढील आर्थिक संकटं संपवायची आहे. एकदा लोकांना फुकटात काही मिळायची सवय लागल्यावर ते सुस्तावतात. ते इथून तिथून कर्ज घेऊ लागतात. ते आर्थिक नियोजन करत नाहीत. या प्रकारची योजना अनेक राज्यांमध्ये यशस्वी होऊ शकते. कारण तिथली परिस्थिती तशी आहे. परंतु हरियाणात ही योजना यशस्वी होऊ शकत नाही,’ असं खट्टर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
भाजपानं २२०-२३० जागा जिंकल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत: सुब्रमण्यम स्वामी
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठं भाकीत केलं आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत २२०-२३० जागा जिंकल्यास नरेंद्र मोदी कदाचित पुढचे पंतप्रधान होणार नाहीत, असं सूचक विधान भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर सध्याचं भाजपच्या नैत्रुत्वतही बदल केले जातील, असा थेट दावाही स्वामींनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडून मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
भारतातील अनेक महत्वाच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तसेच कुख्यात दहशदवादी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताच्या कुटनितीला यश आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (UNSC) बुधवारी (दि.१) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. भारताचा हा मोठा विजय मानला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात निवडणूक संपताच भाजप-सेना सरकारकडून घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ
लोकसभा निवडणुकीदरम्यान सामान्य व्यक्तीला सरकारनं जोराचा धक्का दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली आहे, असं वृत्त द हिंदू बिझनेस लाइननं प्रसिद्ध केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राफेलची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्याची केंद्राची विनंती; लोकसभा निवडणुकांमुळे?
सुप्रीम कोर्टाने राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबाबत १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निर्णयाच्या फेरविचाराची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी आज होणार आहे. परंतु ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारने केली आहे. याबाबतचे पत्र संबंधित पक्षकारांनाही देण्याची परवानगी न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिली. परंतु सुनावणी पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही.
5 वर्षांपूर्वी -
राज यांचा दावा सत्यात तर भाजप तोंडघशी, देशात बेरोजगारी २ वर्षांच्या उच्चांकावर: CMIE अहवाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारची अनेक गुपित भर सभेत उघड केली होती. त्यातील सर्वात महत्वाचा दावा म्हणजे नोटबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी आणि बंद पडलेले उदयोग. दरम्यान, काल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हणत नोटबंदीच समर्थन करताना त्याचे कोणतेही दुष्परिणाम झाले नसल्याचं म्हटलं होतं. मात्र सीएमआयई अर्थात सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’द्वारे अधिकृतरीत्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून राज ठाकरे सत्यात उतरले आहेत तर आशिष शेलार आणि संपूर्ण भाजप तोंडघशी पडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
तब्बल सहा तासांच्या खोळंब्यानंतर एअर इंडियाचा सर्व्हर सुरु
एअर इंडियाचे तांत्रिक बाबी सांभाळणारे ‘सिता सर्व्हर’ डाऊन झाल्याने देशभरातील विमानसेवा विस्कळीत झाली होती. तब्बल सहा तासांच्या खोळंब्यानंतर एअर इंडियाचा सर्व्हर सुरु झाला आहे. त्यामुळे विमानतळांवर अडकून राहिलेल्या प्रवाशांनी अखेर निश्वास सोडला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चलनात २५ पैशांचं नाणंच नाही, मग मोदींच्या आई आजही त्यांना सव्वा रुपया देतात कुठून?
नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमारने अराजकीय मुलाखत घेतली खरी, मात्र ती मुलाखत फिल्मी असल्याचं आता समोर येतं आहे आणि त्याला तास ठोस पुरवा देखील मिळत आहे आणि तो देखील मोदींच्याच तोंडून असं म्हणावं लागेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अक्षय कुमारने घेतलेली मुलाखत सध्या चांगलीच गाजतेय. अनेकांनी या मुलाखतीवर टीका केली तर अनेक जण मोदींची स्तुती करण्यात व्यस्त आहेत. या मुलाखतीत मोदींच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक बाबी समोर आल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आपल्या आईविषयी देखील अनेक गोष्टी या मुलाखतीत सांगितल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मी मतदान केलं, पण VVPAT ची पावती दुसऱ्याच उमेदवाराच्या नावाची: आसामचे माजी डीजीपी
काल देशभरात एकूण ११७ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र अनेक ठिकाणी EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले. २०१४ पासून मोदी सरकारच्या निवडणुकीतील यशामागे ईव्हीएम’मधील छेडछाड देखील एक मुख्य कारण असल्याचा आरोप देखील विरोधकांनी नेहमीच केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
श्रीलंकेतील कोलंबोमध्ये ८ बॉम्बस्फोट, २०७ जणांचा मृत्यू
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये तब्बल ८ ठिकाणी एकामागे एक साखळी बॉम्बस्फोट झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील ३ बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली होती. परंतु, त्यानंतर आता आणखी २ बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. ७व्या बॉम्बस्फोटात २ जणांचा मृत्यू झाला आहे तर ८व्या बॉम्बस्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी ७ जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
जेट एअरवेज आणि एअर इंडिया खरेदीत रिलायन्सला रस
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने जेट एअरवेज आणि एअर इंडिया या २ बड्या नागरी विमान वाहतूक कंपन्या स्वतःच्या ताब्यात घेण्यात रस दाखविला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, आर्थिक संकटात असलेली जेट एअरवेज बुधवारी बंद पडली असून, सरकारी मालकीची एअर इंडियाही अखेरच्या घटका मोजत आहे. दोन्ही कंपन्यांचा मिळून भारतीय हवाई उड्डाण क्षेत्रात एकूण २५ टक्के बाजार हिस्सा आहे.
5 वर्षांपूर्वी -
एमपी, राजस्थान व गुजरातमध्ये पावसाने ३५ जणांचा बळी, मोदींच केवळ गुजरातसाठी मदतीचं ट्विट
मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सलग दोन दिवस म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी सुसाट वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये पावसामुळे एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थान आणि गुजरातमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पावसामुळे तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
तब्बल ३६ उद्योगपती देशातून फरार झाले आहेत; ईडीची न्यायालयात माहिती
फौजदारी गुन्हे दाखल असलेले तब्बल ३६ उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले आहेत, त्यामुळे ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुशेन मोहन गुप्ता देखील पळून जाण्याची शक्यता व्यक्त करत सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने सोमवारी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला. त्यामुळे केवळ विजय मल्या आणि नीरव मोदीच नव्हे, तर अलीकडच्या काळात तब्बल ३६ उद्योगपती देशातून पळून गेले असल्याची माहिती ईडीने सोमवारी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयाला दिली.
6 वर्षांपूर्वी -
तेव्हा राज ठाकरे आठवतील? मराठी युवकांच्या रोजगाराचा व मुंबईचा स्मार्ट गेम 'गिफ्ट'मार्गे होणार?
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांनी वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात रोजगारासारखे महत्वाचे मुद्दे मोदींच्या भाषणातून लुप्त झाले आहेत आणि त्याची जागा हिंदुत्व आणि भारतीय लष्कराच्या शौर्याने घेतली आहे. देशात २ कोटी रोजगार निर्माण करण्याचं आमिष देशातील तरुणांना दाखवत प्रत्यक्षात ५ कोटीच्यावर तरुण देशभरात बेरोजगार केले गेले. केंद्र सरकारला त्याचं काहीच सोयर सुतक नाही अशीच एकूण परिस्थिती आहे. समाज माध्यमाच्या विकृतीतून अनेक तरुणांचे मेंदू धर्म आणि भारतीय लष्कराच्या शौर्याभोवती असे काही गोंगावात ठेवले आहेत की त्या ‘फेसबुक’ वरील फ्री नेटपॅकने आपल्याला कधीच बेरोजगार केलं आहे याची कल्पना देखील तरुणांना राहिलेली नाही.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: संरक्षण करार, अनिल अंबानी रशियाच्या दौऱ्यात देखील मोदींसोबत होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रांसच्या कंपनीसोबत राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याची घोषणा केली. कालांतराने अनिल अंबानी आणि राफेल करारावरून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर आले. सुरक्षाविषयक महागड्या सौद्यांमध्ये केवळ फ्रान्स नसून रशियासोबत देखील एस-४०० मिसाईल डिफेन्स यंत्रणेसाठी तब्बल ४०,००० कोटींचा करारवर ऑक्टोबर २०१८ मध्ये अधिकृतपणे स्वाक्षऱ्या झाल्या जेव्हा रशियाचे पंतप्रधान २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. मात्र तत्पूर्वी २४ डिसेंबर २०१५ मध्ये रशियाच्या दौऱ्यावर गेले होते आणि विशेष म्हणजे त्यात देखील अनिल अंबानी यांचा समावेश होता. त्यात भर म्हणजे रशियन प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी देखील अनिल अंबानींचा होते हे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि काही अंतरावर स्वतः नरेंद्र मोदी देखील उपस्थित विराजमान असल्याचे दिसत होते. तसेच काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांनी देखील राफेल सौंदयापूर्वी फ्रान्सचा दौरा केल्याच्या बातम्या फ्रान्समधील प्रसार माध्यमांनी दिल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Multani Mitti Face Pack | तुमचा 'हा' स्किन टाईप असल्यास कधीही मुलतानी मातीचा वापर करू नका, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News
- Bigg Boss Marathi | दोघींची मैत्री 4 दिवस सुद्धा नाही टिकली; आर्या आणि जानवीची पुन्हा एकदा खडाजंगी - Marathi News
- True Beauty | रेडियंट ग्लो मिळवण्यासाठी फॉलो करा अभिनेत्री शरवरी वाघच्या ब्युटी टिप्स, चेहऱ्यावर वेगळेच तेज येईल
- Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
- Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
- Bigg Boss Marathi | संग्रामची अरबाजला ताकदीची धमकी; दोन बॉडी-बिल्डरची आपापसात झुंज, प्रोमो पाहिलात का?
- Devara Part 1 Movie | आता फक्त 'देवरा पार्ट 1' सिनेमाची चर्चा; एका तासात गाठला 10 मिलियन व्ह्यूजचा आकडा
- Post Office Scheme | तुमच्या मुलींसाठी फायद्याची स्कीम; 10 हजार गुंतवा आणि 37 लाख रुपये मिळवा, फायदा घ्या - Marathi News
- Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News