महत्वाच्या बातम्या
-
दहशतवाद्यांना आश्रयाची पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल : इराण लष्कर
दहशतवादी कारवायांनी इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढल्याने सध्या पाकिस्तानविरुद्ध इराण देखील संतापल्याचे दिसते. दरम्यान, दहशवादी कारवायांना आश्रय देणाऱ्या आणि दहशदवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला इराणने चांगलेच धारेवर धरले आहे. दहशतवाद्यांना पोसण्यामुळे भविष्यात पाकिस्तानला मोठ्ठी किंमत मोजावी लागेल असा सज्जड दम इराणने दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह व विरोधी पक्षांची दहशतवादाविरोधात एकजूट
पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली. तसेच दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईत सरकारसोबत उभे राहण्याचे आश्वासन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिले. तसेच दहशतावादाविरोधात त्रिसूत्री प्रस्ताव देखील पारित करण्यात आला.
6 वर्षांपूर्वी -
'वंदे भारत एक्स्प्रेस' या वेगवान ट्रेनचं इंजिन दुसऱ्याच दिवशी फेल, शेवटच्या डब्याचा ब्रेक जाम
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या देशातील सर्वात वेगवान ट्रेन १८ मध्ये दुसऱ्याच दिवशी बिघाड झाला आहे. शनिवारी सकाळी वंदे भारत एक्स्प्रेस दिल्लीपासून २०० किलोमीटर अंतरावर असतानाच बिघाड झाला. वंदे भारत एक्स्प्रेसला रविवारी पहिल्या कमर्शिअल रनसाठी वाराणसीहून दिल्लीसाठी प्रस्थान केले. यावेळी ट्रेनचं इंजिन फेल झालं. शेवटच्या डब्याचा ब्रेकदेखील जाम झाला होता. यासोबत काही डब्यांमधील वीज गायब झाली.
6 वर्षांपूर्वी -
यापूर्वीचा पुलवामा हल्ला; 'सैन्यात जवान असाल तर जीव जाणारच' असं भाजप खासदार नेपालसिंह बरगळले होते
एक दिवसापूर्वी सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ल्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. देशभरातून संतप्त प्रतिकिया देखील येत आहेत. परंतु, पुलवामा मधील लष्कराच्या जवानांवर झालेला हा काही पहिला भीषण हल्ला नव्हता. यायाधी सुद्धा पुलवामातील प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला केला होता. परंतु देशवासीयांची विसरण्याची प्रवृत्ती राजकारण्यांच्या पथ्यावर पडते. तसं पुन्हा होऊ नये अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रसार माध्यमांच्या बदलत्या भूमिका? २६/११ चा भ्याड हल्ला ते पुलवामामधील हल्ला
काल जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर मोठा आणि भ्याड दहशतवादी हल्ला झाला. दरम्यान, सध्या संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. सदर भ्याड हल्ला इतका भीषण होता की त्यात तब्बल ४० जवानांना वीर मरण आलं आहे. त्यातील अनेकांची तर ओळख होणं देखील कठीण झालं आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुःखात बुडालेला असताना महाराष्ट्रात मात्र एक वेगळंच राजकारण जोरदार पणे सुरु होतं. वास्तविक कालच्या घटनेनंतरची भारतीय प्रसार माध्यमांची भूमिका पाहिल्यास सत्ताधाऱ्यांना सावरून घेण्याचेच प्रकार सुरु असल्याचे प्रथम दर्शनी जाणवतं. त्यात प्रसार माध्यमांकडून ‘ही राजकारण करण्याची वेळ नाही’ या वाक्यप्रचारावर अधिक वापर होताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जाही काढणार: जेटली
पाकिस्तानच्या दहशतवादी जैश-ए-मोहम्मदने गुरुवारी पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ७८ गाड्यांच्या ताफ्यावर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात ४२ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केंद्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला याविषयी अर्थमंत्री यांनी सांगितले. त्यानुसार भारत राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकणार असून, पाकिस्तानचा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देखील काढून घेतला जाणार आहे. तसेच पाकसोबतचे इतर व्यापारी संबंध तोडण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पुलवामा भ्याड दहशतवादी हल्ला; काश्मीरमध्ये इंटरनेट बंद
काल जम्मू- काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात CRPF चे तब्बल ३९ जवान शहीद झाले आहेत. CRPF च्या माहितीनुसार, रस्त्यावर एका ४ चाकी गाडीमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधील बॉम्बचा स्फोट झाला.
6 वर्षांपूर्वी -
हल्ल्याच्या पूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी अॅलर्ट दिला होता, तरी सीरिया व तालिबानी पद्धतीने हल्ला
कालच्या भीषण हल्ल्याच देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी अॅलर्ट जारी केला होता. त्यानंतर देखील हल्ला यशस्वी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अॅलर्ट नुसार, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारीला अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले. त्याच दिवशी हल्ल्याचा महाभयंकर कट, दहशदवाद्यांनी रचला आहे. त्यानुसार हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात असे संकेत गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा यंत्रणांना दिले होते.
6 वर्षांपूर्वी -
मोदींची भाषणात ५६ इंची, पुलवामात दहशतवादी हल्लात CRPFचे ३० जवान शहिद
आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा २०१६ नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! मोदी सरकारकडे नोटाबंदी काळातील लोकांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नाही
२०१६ मध्ये काळापैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने अचानक पुकारलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आता २ वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. परंतु, सदर निर्णयामुळे सर्वसामान्यांना प्रचंड हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या होत्या. दरम्यान, जुन्या नोटा जमा करून नव्या नोटा मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना संपूर्ण वेळ उन्हातान्हात सह परिवार उभे राहावे लागले होते. त्यात, अनेकांचा रांगेत मृत्यू झाल्याच्या खूप घटना घडल्या होत्या. परंतु, नोटाबंदीदरम्यान देशात नेमका किती लोकांनाच नाहक जीव गेला याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संपात सामील झालेल्या कामगारांचा पगार कापला
पगारवाढ तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या बेस्ट कामगारांच्या जानेवारी महिन्याच्या पगारात वाढ झाली. परंतु, दुसऱ्या बाजूला बेस्ट प्रशासनाने कामगारांचा संपकाळातील ९ दिवसांचा पगार कापला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जिओ मेरे लाल? मोदी सरकार BSNLला डिस्कनेक्टिंग इंडिया करण्याच्या तयारीत?
प्रचंड तोट्यात असणाऱ्या BSNL या सरकारी टेलिकॉम कंपनीतील गुंतवणूक काढून घेण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यास नरेंद्र मोदी सरकारनं सुरुवात केल्याचे वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे कंपनी बंद करण्याचा विचार देखील सरकारकडून सुरू असल्याचे समजते. दरम्यान, २०१७-१८ या आर्थिक वर्षात BSNLचा तब्बल तोटा ३१,२८७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे आता बीएसएनएल बंद करण्याबद्दल केंद्र सरकारनं गांभीर्यानं विचार सुरू केल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॅग अहवाल: राफेल विमानाची प्रत्यक्ष किंमतच नमूद नाही, मग महाग की स्वस्त ठरलं कसं?
देशाच्या संरक्षण आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या कराराबाबतचा कॅगचा अहवाल अखेर आज अधिकृतपणे वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेत सादर करण्यात आला आहे. सध्याच्या भाजप प्रणित एनडीए सरकारने केलेला राफेल लढाऊ विमानांचा करार हा आधीच्या काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने केलेल्या करारापेक्षा 2.86 टक्क्यांनी स्वस्त असल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे. तसेच मोदी सरकारने १२६ विमानांच्या तुलनेत ३६ विमानांसाठी करार करताना एकूण १७.०८ टक्के पैसे वाचवले आहेत, असं म्हटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
रंगवलेल्या शौचालयातून पर्यटन? कोणता सुगंधी सोन्याचा आनंद मिळणार पर्यटकांना? वास्तव
युरोपमध्ये विविध पर्यटक तिथल्या घराच्या सुंदर रंगवलेल्या भिंती पाहण्यासाठी जातात. त्यामुळे एक दिवस भारतातील शौचालय इतकी सुंदर होतील की ते पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे. वास्तविक काँग्रेसच्या काळातील ‘हागणदारी मुक्त गाव’ योजना वेगळ्या नावाने राबवून, त्यावर प्रचंड जाहिरातबाजी करत मोदी सरकारने ती योजनाच हायजॅक केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जे स्वतः भ्रष्ट तेच CBI व मोदींना शिव्या देतात? आता मोदींचा हा व्हिडिओ बघा!
काल कुरुक्षेत्र येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जे विरोधक भ्रष्ट आहेत तेच CBI व मोदींना शिव्या देतात’. मागील काही दिवसापासून CBI आणि ईडी’च्या कारवाईने देशभरातील विरोधक हैराण झाले आहेत. ज्या राज्यात निवडणुका लागतात त्याच राज्यातील विरोधकांच्या मागे योगायोगाने CBI आणि ईडी’ची कारवाई सुरु होताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींनी लष्करी गुपिते अनिल अंबानींना सांगून देशद्रोह केला: राहुल गांधी
भारतीय हवाईदलासाठी राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार फ्रान्ससोबत होण्यापूर्वीच त्या विषयीची महत्वाची माहिती उद्योगपती अनिल अंबानी यांना सांगून मोदींनी देशाच्या संरक्षण विषयक अशा अत्यंत गोपनीय कायद्याचा भंग करीत एक प्रकारे देशद्रोहाचा गुन्हा केला असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केला. स्वत:ला देशाचा चौकीदार समजणाऱ्या मोदींवर या महाभयंकर गुन्ह्याबद्दल खटला चालवून त्यांना तुरुंगात पाठवायला हवे, अशी मागणी सुद्धा त्यांनी उचलून धरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप मंत्र्यांची 'सुसाट' फेक-ट्रेन, त्यावर तत्पर प्रवक्ते, तर भक्तांचं 'ओन्ली मोदीजी'
समाज माध्यमांवर आज जी खोट्या प्रचाराची बीज रोवली गेली त्याला सर्वाधिक कारणीभूत म्हणजे भारतीय जनता पक्ष असंच म्हणावं लागेल. अनेक सुशिक्षित तरुणांना देखील त्यांच्या सामाजिक तसेच राजकीय अज्ञानाचा फायदा घेत खोट्या व्हिडिओ आणि एडिटेड गोष्टींच्या आधारे सत्ताधाऱ्यांनी मूर्ख बनवलं आहे. त्यात भाजपच्या अनेक मंत्र्यांचा, आमदारांचा, खासदारांचा आणि त्यांच्या आयटी सेलचा मोठा वाटा आहे. आजही त्याच खोट्या गोष्टींच्या आधारे लोकांना मूर्ख बनवण्याचे प्रकार खुलेआम सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदी भ्रष्टच, अनिल अंबानींनी राफेल प्रकरणी दलालाची भूमिका बजावली: राहुल गांधी
नरेंद्र मोदी यांना राफेल लढाऊ विमानांचे प्रकरण भोगण्याची शक्यता प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व्यक्त करत आहेत. सदरप्रकरणी अनेक कागदपत्र आणि इतर पुरावे देखील समोर येण्यास सुरुवात झाली आहे. राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा चौफेर हल्ला चढवला. अनिल अंबानी यांनी राफेल करार होण्यापूर्वी फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीचा धागा पकडत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राफेल विमान करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींसाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच नरेंद्र मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून, त्यांच्यावर खटला चालवून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
राजस्थानमध्ये गुज्जरांचे आंदोलन तीव्र; रेल्वे पटरीवरच तंबू ठोकले
आरक्षणाच्या मुद्यावरून गुज्जर समाजाचे हिंसक आंदोलन आज देखील सुरूच आहे. त्यामुळे राज्यसरकारच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. सरकारी नोकऱ्या तसेच शिक्षणात एकूण ५ टक्के राखीव जागांच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन तीव्र आणि हिंसक होताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये ‘अग्नितांडव’; १७ जणांचा मृत्यू
दिल्लीत करोलबागमधील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये आज पहाटे ४ वाजता भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून जवळपास १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांच्या आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News
- Multani Mitti Face Pack | तुमचा 'हा' स्किन टाईप असल्यास कधीही मुलतानी मातीचा वापर करू नका, तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News
- Bigg Boss Marathi | दोघींची मैत्री 4 दिवस सुद्धा नाही टिकली; आर्या आणि जानवीची पुन्हा एकदा खडाजंगी - Marathi News
- True Beauty | रेडियंट ग्लो मिळवण्यासाठी फॉलो करा अभिनेत्री शरवरी वाघच्या ब्युटी टिप्स, चेहऱ्यावर वेगळेच तेज येईल
- Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा
- Reliance Share Price | रिलायन्स शेअरने दिला 547% परतावा, पुढेही मालामाल करणार हा शेअर - Maharashtranama Marathi
- Devara Part 1 Movie | आता फक्त 'देवरा पार्ट 1' सिनेमाची चर्चा; एका तासात गाठला 10 मिलियन व्ह्यूजचा आकडा
- Bigg Boss Marathi | संग्रामची अरबाजला ताकदीची धमकी; दोन बॉडी-बिल्डरची आपापसात झुंज, प्रोमो पाहिलात का?
- Post Office Scheme | तुमच्या मुलींसाठी फायद्याची स्कीम; 10 हजार गुंतवा आणि 37 लाख रुपये मिळवा, फायदा घ्या - Marathi News
- SBI Annuity Deposit Scheme | होणार गॅरंटीड कमाई! SBI च्या या योजनेत गुंतवणुकीवर दर महिन्याला परतावा मिळेल - Marathi News