21 April 2025 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER
x

अर्थव्यवस्थेचा सुद्धा विचार करा, दीर्घकाळ लॉकडाऊन परवडणारं नाही - रघुराम राजन

Covid 19, Corona Crisis, Raghuram Rajan, Economy

नवी दिल्ली, २५ एप्रिल: कोरोना व्हायरसचा झटका अशा वेळी बसला आहे. जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था आधीच घसरणीला लागली होती. जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आणि धोका वाढल्याने देशांतर्गत गुंतवणुकीत सुधारणा करावी लागले. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार पुढील आर्थिक वर्ष म्हणजे २०२१-२२ मध्ये करोनाचा प्रभाव संपेल आणि त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था ५ टक्के विकास दर गाठू शकेल असं म्हटले होते. त्यानंतर उलटे संकेत देखील होते. तर २०२०-२१ मध्ये या विकास दरात घट होऊन तो २.८ टक्के इतका असेल असं देखील म्हटलं होतं.

भारतातील लॉकडाऊन आणखी वाढला तर ते अर्थव्यवस्थेसाठी निश्चित चांगले असणार नाही. या लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम अधिक भयानक असतील. या आर्थिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारताला सर्वात प्रथम करोनाचा प्रसार होण्यापासून रोखले पाहिजे. त्याच बरोबर सर्वांना अन्न-धान्य मिळेल याची सोय करावी, असे जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ञ हॅस टीमर यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

दरम्यान, आता रघुराम राजन यांनी देखील केंद्राला आर्थिक स्थितीवरून सतर्कतेचा इशारा दिला आहे. करोनामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी आता सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डाॅ. रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. दीर्घकाळ लाॅकडाऊन भारताला परवडणारे नाही. सरकारने आता जीवनावश्यक गरजा भागवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने २१ दिवसांचा लाॅकडाऊन दुसऱ्यांदा वाढवला आहे. ३ मे रोजी लाॅकडाऊनची मुदत संपुष्टात येणार आहे. करोनाचा वाढता प्रसार देशासाठी धोकादायक आहे. करोना रोखण्यासाठी सरकारने लाॅकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला आहे. मात्र त्यामुळे आर्थिक विकासाला फटका बसला आहे. कोट्यवधी लोकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे राजन यांनी सांगितले. आता परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी सरकारसमोर मोठं आव्हान असेल, असे त्यांनी सांगितले.

आता सरकारने अर्थचक्राला गती देण्याचे काम तातडीने केले पाहिजे. अर्थव्यवस्थेची खालावलेली तब्येत सुधारण्यासाठी पावले उचलावीत. आर्थिक मदतीचे पॅकेज देताना सरकारने जागरुक राहिलं पाहिजे, असेही राजन यांनी स्पष्ट केले. पॅकेजमुळे चलनाला झळ पोहचता कामा नये तसेच व्याजदर देखील वाढता कामा नये, असे राजन यांनी स्पष्ट केले आहे.

 

News English Summary: Raghuram Rajan has also warned the Center to be vigilant over the financial situation. The government should now take immediate steps to reduce the economic losses caused by the corona, said former RBI Governor Dr. Raghuram Rajan. Prolonged lockdown is not affordable for India. The government should now give priority to meeting the necessities of life, he said.

News English Title: Story Former RBI Governor Raghuram Rajan expect union Government should focus of economy restoration covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या