22 April 2025 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER
x

लॉकडाउन वाढला तर लाखो भारतीय गरीबीच्या चक्रात अडकतील: RBI माजी गव्हर्नर

RBI Ex Governor D Subbarao

मुंबई, २७ एप्रिल: ‘लॉकडाउनचा कालावधी वाढला तर लाखो भारतीय गरीबीच्या चक्रामध्ये अडकू शकतात’ अशी शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर दुव्वूरी सुब्बाराव यांनी रविवारी व्यक्त केली. “करोना व्हायरसचे संकट संपल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा ‘व्ही’ शेपमध्ये येईल. अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगली सुधारणा दिसून येईल” अशी अपेक्षा सुब्बाराव यांनी व्यक्त केली.

“दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारत या संकटकाळात चांगली कामगिरी करणार हे खरं आहे. पण ही समाधानकारक बाब नाही. कारण आपला देश गरीब आहे. हे संकट असेच राहिले किंवा लॉकडाउन उठवला नाही तर, लाखो लोक गरीबींच्या चक्रामध्ये अडकू शकतात” असे सुब्बाराव म्हणाले. सदर वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

दरम्यान, नागरिकांच्या उत्पन्नावर करोना संसर्गामुळे आलेल्या मंदीचा परिणाम दिसत असून यामुळे वस्तूंच्या वापरावर आधारित मागणी मोठ्या प्रमाणावर घटणार आहे,’ याकडे भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी लक्ष वेधले आहे. लॉकडाउन संपल्यानंतरही वस्तू आणि व्यक्ती किंवा कामगार यांच्या वहनावर नियंत्रण आल्यामुळे आर्थिक उलाढाल धीम्या गतीने होणार आहे. यामुळे पुरवठा साखळी प्रभावहीन होईल, गुंतवणुकीला धीम्या गतीने चालना मिळेल, काही काळ कामगार टंचाई निर्माण होईल, कुटुंबाचे उत्पन्न घटल्यामुळे मागणी कमी होईल, असे त्यात नमूद केले आहे.

समजा करोना संसर्ग दीर्घकाळ राहिल्यास, हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी लॉकडाउन कायम राहिल्यास तसेच नवनवे हॉटस्पॉट तयार होत राहिल्यास आर्थिक हालचाल रडतखडत सुरू राहील. बऱ्याच अंशी आर्थिक उलाढाल थांबेल आणि त्याचा परिणाम म्हणून जीडीपीचा वृद्धीदर उणे ०.९ टक्क्यापर्यंत येऊ शकेल, असेही सीआयआयने म्हटले आहे.

 

News English Summary: Former Reserve Bank of India Governor Duvvuri Subbarao on Sunday said that if the lockdown period is extended, millions of Indians could fall into the cycle of poverty.

News English Title: Story Lockdown may push millions into poverty says ex RBI governor D Subbarao News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या