19 April 2025 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

ग्राम परिवर्तन; यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल, कार्यक्षम जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांची कामगिरी: सविस्तर

यवतमाळ : ग्रामीण भागात विकास साध्य करायचा म्हटलं की आधी तिथल्या सामान्य लोकांप्रती प्रामाणिक आस्था आणि तिथे भेडसावणाऱ्या मूळ समस्यांचा अभ्यास करणे सुद्धा तितकेच गरजेचे असते. परंतु, लोकाभिमुख विकास साधायचा म्हटल्यावर विषय जिल्ह्यातील प्रशासकीय सेवेवर येऊन थांबतो, असा साहजिकच विचार प्रत्येकाच्या मनात येतो. मात्र, देशभरात मोजकेच प्रामाणिक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत जे प्रशासनातील अधिकारांचा अभ्यासपूर्ण वापर करतात आणि ग्रामीण भागातील लोकाभिमुख विकास तसेच विविध योजना सत्यात उतरवताना दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ज्यांच्यामुळे ग्राम परिवर्तनात यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी इथल्या विविध समस्यांचा अभ्यास केला होता. तसेच पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी शेतकरी आत्महत्या, पीककर्ज, कर्जमाफी आणि पाणीटंचाई सारख्या गंभीर विषयांवर स्वतंत्र बैठका आयोजित करून स्थानिक नागरिकांना कसा दिलासा देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं. दरम्यान, राज्य सरकारच्या ५ महत्वाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याला राज्यात अव्वल क्रमवारीत पोहोचवले. पाण्याची समस्या भीषण असल्याने त्यासंबंधित विषयांवर गंभीरपणे लक्ष केंद्रित आणि काही शिस्तबद्ध नियोजनातून पाण्याची पातळी ७ मित्राने वाढवण्यात यश मिळवलं.

दरम्यान, राज्य शासन, टाटा ट्रस्ट, रिलायन्स फाउंडेशन, ऍक्सिस बँक फाउंडेशन आणि बायएफ’च्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन राबवून यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ३६ ग्रामपंचायतीच्या ७२ गावांमध्ये स्वतःच्या प्रशासकीय कुशलतेतून विकासाचं उत्तम उदाहरण निर्माण केलं. टाटा ट्रस्टने यवतमाळ आणि नेर तालुक्यात मत्स्यपालन, सौरऊर्जेवरील अंगणवाडी तसेच डिजिटल शाळा निर्मितीच्या कामांना बळ दिले. विशेष म्हणजे इथे पिण्याचे पाणी, किचन गार्डन आणि शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. बायफ’ने ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे, तसेच व्यवसाय कसा करावा आणि त्या संबंधित प्रस्ताव कसा बनवायचा याचे ग्रामस्थांना मागदर्शन केलं आणि त्यांच्यातला उद्योजक जागृत करण्यावर भर दिला.

इतकंच नव्हे तर लोकशाही आणि सामान्य जनता हेच आपल्या देशाचा मूळ गाभा असल्याने निवडणूक प्रक्रियेतील संभ्रम लोकांच्या मनातून दूर करण्यासाठी गावोगावी आधुनिक ईव्हीएम मशिन्स मागवल्या आणि लोकांना त्याविषयी मार्गदर्शन करून मोठ्याप्रमाणावर जनजागृती सुद्धा केली. प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्याच्या विकासाची माहिती करून घेतली तेव्हा जिल्ह्याला मिळालेल्या बहुमानाचे श्रेय म्हणजे ग्रामस्थांच्या श्रमाचे फलित असल्याचे सांगितले आणि त्यातून त्यांच्यातला जिल्हाधिकारी नव्हे, तर स्वतःच्या टीम’ला सोबत घेऊन ‘टीमवर्क’ने स्वप्न सत्यात उतरवणारा कुशल ‘प्रशासकीय लीडर’ समोर आला. कारण कोणत्याही गावात कोणतीही योजना ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय सत्यात उतरूच शकत नाहीत, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

असे कर्तव्यदक्ष व उत्तम प्रशासक तसेच लोकाभिमुख सेवा करणारे यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख [IAS- जिल्हाधिकारी यवतमाळ] यांची ह्या वर्षीच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर – २०१९’ पुरस्कारासाठी प्रशासन आय.ए.एस या प्राॅमिसिंग या कॅटेगरी मध्ये नामांकन झाले आहे. दरम्यान, प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांना सामान्यांकडून सुद्धा प्रोत्साहन मिळाले गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. राजेश देशमुख यांना या लिंक वर Click करून त्यांना ऑनलाईन मतदान करा आणि लोकशाही अजून सुदृढ करा.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या