16 April 2025 5:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Bigg Boss Marathi | बिग बॉस फेम 'अरबाज पटेलने' सांगितलं छत्रपती शिवरायांचा जयजयकार न करण्यामागचं कारण - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • अरबाजने सांगितलं हे कारण :
  • सध्या काय सुरू आहे बिबींच्या घरात :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रभर केवळ बिग बॉस मराठीची चर्चा होताना पाहायला मिळतेय. अगदी पहिल्या आठवड्यापासून एका मागोमाग अनेक सदस्य कुठेतरी खेळामध्ये कमी पडल्यामुळे घराबाहेर पडले. मागील आठवड्यात बॉडी बिल्डर संग्राम आणि अरबाज पटेल या दोघांना घराचा निरोप घ्यावा लागला.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारा पहिला वहिला सदस्य म्हणजे पुरुषोत्तम दादा. ज्यावेळी पुरुषोत्तम दादा बाहेर पडले त्यावेळी त्यांनी विठू माऊलीचं नामस्मरण करत हात जोडून पांडुरंगा चरणी स्वतःची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील जयजयकार केला. त्यावेळी घरातील सर्व सदस्य पायातील चप्पल काढून आणि हात जोडून पुरुषोत्तम दादा मागे देवांचं नामस्मरण करत होते. यावेळी अरबाज हाताची घडी घालून गप्पचूप उभा होता.

त्यानंतर प्रेक्षकांकडून अरबाजला प्रचंड प्रमाणात टोल करण्यातही आलं होतं. सध्या अरबाज घराबाहेर पडला असून तो ठीक-ठिकाणी इंटरव्यूसाठी जात आहे. एका वृत्तवाहिनीच्या घेतलेल्या मुलाखतीत अरबाजने छत्रपती शिवरायांची घोषणा का केली नाही याचं स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं काय म्हणाला अरबाज पाहुया

अरबाजने सांगितलं हे कारण :

अरबाजला एका वृत्तवाहिनीच्या इंटरव्यू दरम्यान अनेक प्रश्न विचारण्यात आले. सर्वातआधी त्याला असा प्रश्न विचारण्यात आला की,’तू बरा आहेस का, यावर अरबाज म्हणाला ,’नाही मी खूप दुःखी आहे’. परंतु तो असं मस्करीत म्हणाला. पुढे इंटरव्यूमध्ये अरबाजला तू पुरुषोत्तम दादांबरोबर महाराजांच्या जयजयकार केला नाही त्याबद्दल काय सांगशील अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अरबाज म्हणाला की,’मला ना माहीतच नव्हतं तिथे काय चाललं होतं. कारण की कधी कधी आपल्या मनात खूप विचार चालू असतात. जर मी काही वाईट रिएक्शन दिलं असतं आणि वाकडं तिकडं तोंड केलं असतं तर, तुम्हाला कळालं असतं की काहीतरी आहे याच्या मनामध्ये’.

पुढे अरबाज म्हणतो की,’ फर्स्ट नॉमिनेशन होतं आणि मी खूप इमोशनल आहे आणि मी त्यांना नॉमिनेट केलं होतं आणि ते जात होते. मी काहीतरी विचार करत होतो. मी ऐकलेही नाही ते काय म्हणत होते’.

अशा पद्धतीचं स्पष्टीकरण अरबाजने दिल. परंतु, समस्त प्रेक्षकांची मने दुखवली गेली म्हणून त्याने लगेच माफी देखील मागितली. पुढे अरबाजच्या म्हणण्याप्रमाणे तो सुद्धा संभाजीनगरचाच आहे आणि त्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी रिस्पेक्ट आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य अरबाजने केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaz Shaikh (@mr.arbazpatel)

सध्या काय सुरू आहे बिबींच्या घरात :

सध्या बिग बॉसच्या घरात 8 सदस्य उरले आहेत. यामधून चालू आठवड्यात कोण घराबाहेर जाणार त्याकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर बिग बॉसचा आजचा भाग पाहणे खरोखरच रंजक ठरणार आहे. कारण की आजच्या भागात टास्कचा महाबाप बिग बॉस यांनी घरातील सदस्यांसमोर आणून ठेवला आहे. आता पुढे टास्क कसा खेळला जाणार, त्याचबरोबर या टास्कचे कोणकोणते नियम असतील त्या सर्व गोष्टींकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel 26 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या