सुराज्याच्या जाहिराती करत शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजावर करतंय अमानुष लाठीचार्ज, फडणवीसांचा आंदोलकांवर दोष, राज्यभर संताप

Maratha Morcha Protest | जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी जिल्ह्यात मराठा आक्रोश मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्या लाठीचार्जमध्ये आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक स्त्री-पुरुष जखमी झाले. अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाल्याचे वृत्त पसरताच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला
या घटनेमुळे सत्ताधारी आणि गृह खात्यावर ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. हे प्रकरण शांत नाही झालं तर मला आंदोलनकर्त्यांची भेट घ्यावी लागेल असा सूचक इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आज शरद पवार आणि भाजपचे खासदार उदयनराजे आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहेत.
गृहमंत्री फडणवीसांकडून मराठा आंदोलकांवर दोष
जालन्यातील घटना ही दुर्दैवी पण आहे आणि गंभीरपण आहे. पण त्याठिकाणी जे उपोषणकर्ते होते त्यांच्याशी स्वत: मुख्यमंत्री बोलले होते. विविध प्रकारे त्यांच्याशी आमचा संवाद सुरू होता. त्यांनी उपोषण परत घ्यावं.. कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरतेने काम करतेय पण हा न्यायालयाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे हा विषय काही एका दिवसात संपणारा नाही. तो सोडविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न हे चालले आहेत. हे गंभीरपणे प्रयत्न सुरू आहेत.’
आंदोलनकर्त्यातून तीव्र पडसाद
मराठा आक्रोश मोर्चावर लाठीचार्ज झाल्यानंतर राज्यभरातून त्यावर आता प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच लाठीचार्ज झाल्यानंतर आंदोलनकर्त्यातून तीव्र पडसाद उमटत आहेत. लाठीचार्ज झाल्यानंतर अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहेत. त्यामुळे आज आंदोलनाचा कोणताही परिणाम वाहनांवर होऊ नये यासाठी जालन्यासह या भागातील अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
राजकीय वातावरण ढवळून निघाले
मराठा आक्रोश मोर्चावर लाठीचार्ज झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लाठीचार्ज झाल्यानंतर वेगवेगळे पडसाद उमटत असल्याने प्रशासनाकडूनही शांततचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभरात वेगवेगळे पडसाद उमटत असतानाच मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याचे सांगितले आहे.
News Title : Jalna Maratha Akrosh Morcha Protest check details on 02 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल