Loksabha Election 2024 | ममता बॅनर्जींनी तिसरी आघाडीचा हट्ट सोडला, काँग्रेसला मोठी ऑफर, लोकसभेसाठी विरोधकांची खास योजना

Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीला आता एक वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. पुढील वर्षी याच काळात सार्वत्रिक निवडणुका होणार असून, त्यासाठी भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस, जेडीयू आणि आरजेडी’सारखे प्रमुख पक्ष विरोधी आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत असून त्यासाठी नितीशकुमार यांनी नुकतीच अनेक नेत्यांची भेट घेतली आहे.
नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटींनंतर त्यांनी तिसऱ्या आघाडीचा हट्ट सोडून काँग्रेससाठी खास ऑफर दिल्याचं वृत्त आहे. नितीशकुमार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांचा काँग्रेसबद्दलचा वैर कमी झाल्याचा दावा जेडीयूचे ज्येष्ठ नेते केसी त्यागी यांनी केला आहे. तसेच भारत जोडो यात्रेचे सोशल ऑडिट कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकीत सिद्ध झाल्याने ममता बॅनर्जी यांचा विचार पूर्ण बदलला असल्याची माहिती पुढे आली आहे.
जेडीयू नेते केसी त्यागी यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच ममता बॅनर्जी यांच्यासमोर वन टू वन रणनीती मांडली होती, ज्याला त्यांनी पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीत बलाढ्य प्रादेशिक पक्षांना त्यांच्या राज्यात एकटे सोडले पाहिजे, जेणेकरून ते भाजपशी स्पर्धा करू शकतील, असेही ते म्हणाले. त्याबदल्यात हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष (भाजप-काँग्रेस) ज्या २०० जागांवर थेट लढत आहेत, त्या जागांवर हे पक्ष काँग्रेसला पाठिंबा देतील.
अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, केसीआर, ममता बॅनर्जी यांच्यासह सर्वच विरोधी पक्ष काँग्रेसला एकटे पाडून तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आतापर्यंत मानले जात होते. पण आता ममतांनी 2024 च्या निवडणुकीपूर्वी बिगर काँग्रेसी तिसरी आघाडी स्थापन करण्याचा इरादा सोडला आहे. नितीशकुमार यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली तेव्हा ममतांनी संयुक्त विरोधी आघाडी स्थापन करण्याबाबत सकारात्मकता दाखवली.
ममतांना आधी तिसरी आघाडी स्थापन करायची होती
आधी ममतांचं मत वेगळं होतं. त्यांना बिगर काँग्रेसी तिसरी आघाडी स्थापन करायची होती. विरोधी पक्षांनी भाजपविरोधात ‘एक विरुद्ध एक’ उमेदवार उभा करावा, या नितीशकुमार यांच्या फॉर्म्युल्याशी त्या आता सहमत आहेत, कारण त्यामुळे प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व देखील टिकून राहील.
ते पुढे म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते की, विरोधी पक्षनेत्यांची बैठक पाटण्यात बोलवावी. जेपींची (जयप्रकाश नारायण) चळवळ सुरू झाली तेव्हा बिहार केंद्रात परिवर्तनाचे प्रतीक होते. केसीआर आणि अरविंद केजरीवाल यांना घेऊन बिगर काँग्रेसी तिसरी आघाडी स्थापन करण्याचा ममता बॅनर्जी यांचा विचार बदलला आहे.
कोणी कुठून लढावं हे ममतांनी सांगितलं…
नितीशकुमार यांचा विरोधकांच्या ऐक्याचा फॉर्म्युला, ज्यात आम्ही भाजपच्या उमेदवाराविरोधात उमेदवार उभा करण्याचा प्रस्ताव ठेवतो, तो आता अधिकाधिक लोकांनी स्वीकारला आहे. ममता बॅनर्जी यांनी नुकतेच म्हटले होते की, जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, तेथे त्यांनी ताकदीने लढले पाहिजे. कर्नाटकचा निर्णय हा भाजपविरोधातील निकाल आहे. जनता विरोधी पक्षासोबत आहे. जनतेवर अत्याचार होत आहेत, अर्थव्यवस्था कोलमडली आहे, लोकशाही अधिकारांवर बुलडोझर चालवला जात आहे.
पुढे ते माहिती देताना म्हणाले. प्रादेशिक पक्षांनी नेमकं काय करावं? म्हणजे पश्चिम बंगाल घ्या, पश्चिम बंगालमध्ये आम्ही (टीएमसी) ने लढले पाहिजे. ‘आप’ने दिल्लीत लढावे. बिहारमध्ये नितीशजी आणि तेजस्वी आणि काँग्रेस एकत्र आहेत तिथे ते एकत्रित लढतील. आणि निर्णय सुद्धा तेच घेतील. त्यांचा फॉर्म्युला मी ठरवू शकत नाही. चेन्नईत त्यांची (एमके स्टॅलिन यांची द्रमुक आणि काँग्रेस) मैत्री आहे आणि ते एकत्र लढू शकतात. झारखंडमध्येही ते (झामुमो-काँग्रेस) एकत्र आहेत आणि इतर राज्यांमध्येही. त्यामुळे ही त्यांची निवड असेल. त्यामुळे सर्वबाजूने विरोधकांची योग शक्ती पणाला लागेल आणि भाजपचा निश्चित पराभव होईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Loksabha Election 2024 oppositions strategy check details on 17 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL