21 February 2025 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल Senior Citizen Savings Scheme | एकदाच गुंतवणूक करा, दर 3 महिन्यात 1,20,000 रुपये मिळतील, योजनेचे फायदे जाणून घ्या Horoscope Today | शनिवार 22 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा शनिवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

देशातील सर्वच राज्यात भाजपच्या गुजरात लॉबीचे वर्चस्व असावं हा हट्ट मोदी-शहांना नडतोय? गुजरात लॉबीला वसुंधरा राजेंच्या भूमिकेची धास्ती

Rajasthan BJP

Rajasthan BJP | राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता कमी आणि नुकसान अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच पक्षांतर्गत नेतृत्वसंघर्षाचेही संकट उभे ठाकले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्व सातत्याने सामूहिक नेतृत्वासाठी आग्रही आहे, तसेच गुजरात लॉबीला सर्वच राज्यांमध्ये आपलंच प्राबल्य हवं असतं. मात्र माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा बलाढ्य गट त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं यासाठी प्रचंड राजकीय दबाव वाढवत आहेत.

राजस्थानसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका या वर्षाच्या अखेरीस महत्त्वाच्या आहेत, कारण त्याचे निकाल पुढील वर्षी एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवतील. विशेष म्हणजे या पाचही राज्यांमध्ये म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांपैकी मिझोराम वगळता सर्व चार राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेत्यांचे चेहरे मजबूत स्थितीत आहेत. मात्र मणिपूरमधील हिंसाचाराने मणिपूरमध्ये सुद्धा भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांसमोर मोठं राजकीय आव्हाहन उभं राहिलं आहे. सर्व्हेनुसार या राज्यांमध्ये काँग्रेस कर्नाटकचा विजय रिपीट करेल असं म्हटलं जातंय. त्यात राजस्थानमध्ये भाजपवर पक्षांतर्गत दबाव वाढला आहे.

राजस्थामध्ये गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह मिटला असताना आता तो भाजपमध्ये पेटल्याचं चित्र आहे, मात्र दुसरीकडे काँग्रेस सध्या एकवटलेली दिसत आहे. त्याचबरोबर काँग्रेस सरकारने अशा अनेक घोषणा आणि कार्यक्रम सुरू केले आहेत, ज्यामुळे सत्ताविरोधी वातावरणही कमी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे भाजपही अतिशय सावध आहे.

गेल्या दोन दशकांत भाजप आणि काँग्रेसचे राजकारण दोन नेत्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे. भाजप सरकारचे नेतृत्व वसुंधरा राजे आणि काँग्रेस सरकारचे नेतृत्व अशोक गेहलोत करत होते. अशा तऱ्हेने वसुंधरा राजे यांचा चेहरा जाहीर करण्यासाठी भाजपमधील एक गट पक्षावर दबाव टाकत आहे.

मात्र, राज्यातील पक्षनेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव ही भाजपसाठी सर्वात मोठी समस्या आहे. गेल्या पाच वर्षांत येथे अनेक प्रयोग झाले, पण तरीही राज्यात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सर्वाधिक वजनदार नेत्या आहेत. मात्र, राज्यात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासारखे चेहरेही पक्षाकडे आहेत. यावेळी पक्षाने ज्येष्ठ नेते घनश्याम तिवारी यांना राज्यसभेत आणून गुलाबचंद कटारिया यांना राज्यपाल केले. जगदीप धनखड़ यांना उपाध्यक्ष बनवून पक्षाने राजस्थानचे राजकारण सुधारण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे.

२०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसला १००, भाजपला ७३, बसपाला ६, रालोपीला ३, माकपला २, बीटीपीला २, रालोदला १ आणि १३ अपक्षांना जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप (२४) आणि मित्रपक्ष रालोप (एक) यांनी सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्यात काँग्रेस मजबूत झालेली असताना दुसरीकडे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने चित्र बदललं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसेल असं स्थानिक राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

News Title :  Rajasthan BJP politics check details on 15 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rajasthan BJP(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x