16 April 2025 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

सुपडा साफ होणार! मोदी-शहा, २०० खासदार, ७० केंद्रीय मंत्री, ११ मुख्यमंत्री फुसके बार ठरणार: सर्व्हे

Delhi Assembly Election 2020, CM Arvind Kejariwal, BJP, Modi Shah

नवी दिल्ली : बहुचर्चित दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता मिळविणार हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील ७० जागांपैकी ५४ ते ६० जागांवर आम आदमी पक्षाचा विजय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

टाइम्स नाऊ आणि इप्सोसने (आयपीएसओएस) संयुक्तरित्या केलेल्या या सर्वेक्षणामध्ये दिल्लीकरांनी आपला पसंती दिल्याचे दिसत आहे. ५२ टक्के दिल्लीकरांनी आपच्या पारड्यात मत दिले आहे तर ३४ टक्के जनतेने भाजपाला मत दिले आहे. सध्याची परिस्थिती पाहिल्यास भाजपाच्या मतांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता या सर्वेक्षणामधून दिसत आहे. २०१५ साली झालेल्या निवडणुकीपेक्षा यंदा आपला कमी मते मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०१५ साली आपला ५५ टक्के मते मिळाली होती. यंदा हा आकडा ५२ टक्के इतका असेल असा अंदाज आहे.

तत्पूर्वी, ‘सी व्होटर’ केलेल्या सर्वेक्षणात ‘आप’ला ५४ ते ६४ म्हणजे सरासरी ५९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. गेल्यावेळी मिळालेल्या जागांच्या तुलनेत यंदा कमी जागा मिळतील असा अंदाज होता. तर, भारतीय जनता पक्षाला ३ ते १२, काँग्रेसला ० ते ६ अशा जागा मिळण्याचे सर्वेक्षणात म्हटले होते. विधानसभेत सत्ता मिळविण्यासाठी ३६ जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस यंदा भोपळा फोडू शकते, असेही म्हटले आहे.

दरम्यान, “आम्ही जी विकासकामं केली आहेत, त्यावरच आम्ही मतं मागणार आहोत. जर आम्ही गेल्या ५ वर्षात तुमची कामं केली असं वाटत असेल तरच आम्हाला मत द्या. जर तुम्हाला वाटत असेल तरच आम्हाला सत्तेत पुन्हा येण्याची संधी मिळायला हवी”, निवडणुक आयोगाने तारखांची घोषणा केल्यानंतर केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सदर वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, केजरीवाल यांनी विकासाच्या मुद्यांवर भारतीय जनता पक्षाला घाम फोडल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंड मधील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून तगडी फौज केजरीवालांविरोधात उभी करणार असल्याचं चित्र आहे. त्यासाठी देशभरातील तब्बल २००, खासदार, ७० केंद्रीय मंत्री आणि ११ विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत.

 

Web Title:  AAP Party could win 54 60 seats BJP will failed says Times Now Psos Opinion Poll.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Kejariwal(7)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या