23 February 2025 8:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

हा देश लोकांपासून बनतो, जमिनीच्या तुकड्यांपासून नाही: राहुल गांधी

Congress, Rahul Gandhi, Article 370, Jammu Kashmir

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करुन या राज्याला केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सोमवारपासून केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयावर अनेक स्तरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अखेर 24 तासानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या या निर्णयावर आपलं मौन सोडलं आहे.

सत्ताधाऱ्यांकडून राज्यघटनेचं उल्लंघन होत असल्याची टीका करताना राहुल गांधी यांनी काही निवडक लोकप्रतिनिधींना कारागृहात टाकलं जात असल्याचं म्हटलं आहे. “हा देश लोकांपासून बनतो, जमिनीच्या तुकड्यांपासून नाही. तसंच या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे”, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रला एकसंघ ठेवण्यासाठी लोकांची गरज लागते जमिनीचे तुकडे करुन राष्ट्र उभं राहत नाही. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जेलमध्ये टाकून संविधानाचं उल्लंघन केलं गेलं. जम्मू काश्मीरचे तुकडे करुन राष्ट्रीय एकात्मता मजबूत केली जाऊ शकत नाही असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारने सोमवारी कलम ३७० रद्द करण्याचा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसने राज्यसभेत जोरदार विरोध केला. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. ‘एकतर्फी निर्णयाने जम्मू-काश्मीरचे विभाजन करणे, लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकणे आणि राज्यघटनेचे उल्लंघन करून राष्ट्रीय एकता साधता येते का,’ असा सवाल राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x